शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव; मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार पुतळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 14:04 IST

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सौंसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्याची येईल असं सांगितले आहे.

भोपाळ - छिंदवाडा परिसरात असलेल्या सौंसर गावाजवळ बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावर कारवाई केल्याप्रकरणी अनेक वाद निर्माण झाले. शिवपुतळ्याच्या चौथऱ्यावर जेसीबीने कारवाई करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातही उमटले. 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सौंसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसवण्याची येईल असं सांगितले आहे. तर कमलनाथ यांचे चिरंजीव असलेले खासदार नकुलनाथ यांनी शिवाजी महाराज पुतळा बनवणे आणि त्याची स्थापना करणे यासाठी जो काही खर्च लागेल तो स्वखर्चातून करु अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर छिंदवाडामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवप्रेमींमध्ये जो राग होता तो शांत करण्यात मध्य प्रदेश सरकारला यश आलं आहे. 

छिंदवाडाच्या मोहगाव चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा जेसीबी मशीनच्या सहाय्याने हटवण्यात आला होता. त्यावरुन परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवप्रेमींनी याविरोधात आंदोलन केलं होतं. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. या संपूर्ण तणावाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: माहिती दिली की, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचे गौरवर आहे. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना मोठ्या उत्साहाने होणं गरजेचे आहे. रात्रीन चोरून अशाप्रकारे करणं योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना छत्रपतींचा प्रतिमा पुन्हा स्थापित करण्याची परवानगी द्यावी असे आदेश दिले. तर खासदार नकुलनाथ यांनी स्वखर्चातून हा सर्व खर्च करतील असं सांगण्यात आलं. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावरुन भाजपाने काँग्रेस आणि शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला होता.

तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेसवर निशाणा साधला. मध्य प्रदेशमधल्या छिंदवाड्यामध्ये आमच्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाताहत आणि विटंबणा करण्यात आली. त्याचा भारतातील प्रत्येक व्यक्ती निषेध करतो आहे. छत्रपतींचा हा अपमान भारत देश कधीच सहन करणार नाही. याबाबत मध्य प्रदेश सरकारनं माफी मागितली पाहिजे. त्याठिकाणी महाराजांचा पुतळा पूर्ण सन्मानानं उभा केला पाहिजे, अशी आमची मागणी त्यांनी केली होती. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश