शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

केंद्रीय निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केली महत्वाची मागणी; पंतप्रधानांचेही कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:10 IST

निती आयोगाची बैठक

नवी दिल्ली :  तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण करावे, जेणेकरून भारत कृषिक्षेत्रात स्वयंपूर्ण होईल आणि जगाचे नेतृत्व करू शकेल. आयात कमी करून निर्यात वाढविण्यासाठी राज्यांनी व्यापार, पर्यटन आणि तंत्रज्ञानाला  ( ट्रेड, टुरिझम, टेक्नॉलॉजी-३ टी) चालना देण्यावर भर द्यावा, असेे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुलभ जीवनमान, पारदर्शक सेवा वितरण,  जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुर्बलतेऐवजी वेगवान शहरीकरण भारताची ताकद होईल. खाद्यतेलाच्या उत्पादनात भारताने स्वयंपूर्ण झाले पाहिजे. स्वयंपूर्ण होण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न-प्रक्रिया क्षेत्र अत्याधुनिक करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वव्यापी साथीपासून नियामक आयोगाची प्रत्यक्षात झालेली ही पहिलीच बैठक होय. या बैठकीला २३ मुख्यमंत्री, ३ नायब राज्यपाल, २ प्रशासक आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पीक विविधीकरण, डाळी, तेलबियाणे आणि अन्य कृषी मालात स्वयंपूर्णता,  शालेय आणि उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच नागरी शासन या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बहिष्कार टाकला, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे बैठकीला जाण्याचे टाळले.  

जीएसटी भरपाईचा अवधी पाच वर्षांसाठी वाढवावा - बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी  जीएसटी लागू केल्याने महसुलात तूट झाली असल्याने त्याच्या मोबदल्यात राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी भरपाईचा अवधी पाच वर्षांसाठी वाढविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले की, राज्यघटनेच्या संघराज्य संरचनेविरुद्ध केंद्राने जाऊ नये. ओडिशावर विशेष लक्ष द्यावे आणि निधी देण्याची गरज आहे, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बैठकीत सांगितले.

‘उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत व्हावी हमीभावाने खरेदी’

किमान हमीभावाने सरकारद्वारे होणाऱ्या शेतमालाच्या खरेदीची मर्यादा एकूण उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीत केली, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने पाठिंबा द्यावा, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र