शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

केंद्रीय निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केली महत्वाची मागणी; पंतप्रधानांचेही कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:10 IST

निती आयोगाची बैठक

नवी दिल्ली :  तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण करावे, जेणेकरून भारत कृषिक्षेत्रात स्वयंपूर्ण होईल आणि जगाचे नेतृत्व करू शकेल. आयात कमी करून निर्यात वाढविण्यासाठी राज्यांनी व्यापार, पर्यटन आणि तंत्रज्ञानाला  ( ट्रेड, टुरिझम, टेक्नॉलॉजी-३ टी) चालना देण्यावर भर द्यावा, असेे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुलभ जीवनमान, पारदर्शक सेवा वितरण,  जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुर्बलतेऐवजी वेगवान शहरीकरण भारताची ताकद होईल. खाद्यतेलाच्या उत्पादनात भारताने स्वयंपूर्ण झाले पाहिजे. स्वयंपूर्ण होण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न-प्रक्रिया क्षेत्र अत्याधुनिक करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वव्यापी साथीपासून नियामक आयोगाची प्रत्यक्षात झालेली ही पहिलीच बैठक होय. या बैठकीला २३ मुख्यमंत्री, ३ नायब राज्यपाल, २ प्रशासक आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पीक विविधीकरण, डाळी, तेलबियाणे आणि अन्य कृषी मालात स्वयंपूर्णता,  शालेय आणि उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच नागरी शासन या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बहिष्कार टाकला, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे बैठकीला जाण्याचे टाळले.  

जीएसटी भरपाईचा अवधी पाच वर्षांसाठी वाढवावा - बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी  जीएसटी लागू केल्याने महसुलात तूट झाली असल्याने त्याच्या मोबदल्यात राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी भरपाईचा अवधी पाच वर्षांसाठी वाढविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले की, राज्यघटनेच्या संघराज्य संरचनेविरुद्ध केंद्राने जाऊ नये. ओडिशावर विशेष लक्ष द्यावे आणि निधी देण्याची गरज आहे, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बैठकीत सांगितले.

‘उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत व्हावी हमीभावाने खरेदी’

किमान हमीभावाने सरकारद्वारे होणाऱ्या शेतमालाच्या खरेदीची मर्यादा एकूण उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीत केली, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने पाठिंबा द्यावा, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र