शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

शेतकरी व स्थानिकांमध्ये सिंघू सीमेजवळ चकमक; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 04:25 IST

शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये शुक्रवारी जोरदार चकमक झाली. बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमार केला.

सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलकांनी ही जागा सोडून निघून जावे, अशी मागणी करत शेकडो स्थानिक नागरिक तिथे जमा झाले. पण, तिथून जाण्यास शेतक-यांनी नकार देताच स्थानिक नागरिक संतप्त झाले. शेतकरी व त्यांच्यामध्ये जोरदार चकमक सुरू झाली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. शेतकरी राहात असलेले तंबू पाडून टाकण्याचा प्रयत्न झाला. सरतेशेवटी या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. या घटनेनंतर सिंघू सीमेवरील बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे.सिंघू सीमेवर जिथे आंदोलन सुरू आहे, त्याच्या जवळच गुरु तेगबहादुर स्मारक आहे. तिथे बांधकाम सुरू असलेल्या काही खांबांवर स्थानिक नागरिकांनी चढून तिथे लावलेले शेतकरी संघटनांचे ध्वज काढून टाकले व त्याजागी भारताचा तिरंगा ध्वज फडकविले.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस