शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

शेतकरी व स्थानिकांमध्ये सिंघू सीमेजवळ चकमक; जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 04:25 IST

शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये शुक्रवारी जोरदार चकमक झाली. बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीमार केला.

सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलकांनी ही जागा सोडून निघून जावे, अशी मागणी करत शेकडो स्थानिक नागरिक तिथे जमा झाले. पण, तिथून जाण्यास शेतक-यांनी नकार देताच स्थानिक नागरिक संतप्त झाले. शेतकरी व त्यांच्यामध्ये जोरदार चकमक सुरू झाली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. शेतकरी राहात असलेले तंबू पाडून टाकण्याचा प्रयत्न झाला. सरतेशेवटी या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. या घटनेनंतर सिंघू सीमेवरील बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी केला आहे.सिंघू सीमेवर जिथे आंदोलन सुरू आहे, त्याच्या जवळच गुरु तेगबहादुर स्मारक आहे. तिथे बांधकाम सुरू असलेल्या काही खांबांवर स्थानिक नागरिकांनी चढून तिथे लावलेले शेतकरी संघटनांचे ध्वज काढून टाकले व त्याजागी भारताचा तिरंगा ध्वज फडकविले.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस