शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

“इंदिरा गांधींविरोधातील अलाहाबाद हायकोर्टाचा ‘तो’ निर्णय प्रचंड धाडसी”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 10:48 AM

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

अलाहाबाद: गेल्या काही दिवसांपासून देशात घडणाऱ्या अनेकविध घटनांवर सर्वोच्च न्यायालय आणि त्यातील न्यायाधीश परखड शब्दांत मते मांडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पुन्हा एक असेच मोठे वक्तव्य केले आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी राहण्यास अपात्र ठरविण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय प्रचंड हिंमतीचा होता, असा दाखला न्या. रमणा यांनी दिला आहे. (cji nv ramana says cancellation of indira gandhi election verdict of allahabad high court was courageous)

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या इतिहासाचे अनेक दाखले न्या. रमणा यांनी यावेळी दिले. निवडणूक गैरप्रकार केल्याच्या आरोपांखाली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांचा निकाल हा अतिशय धाडसी निकाल होता व त्याने देशाला हलवून टाकले. यातूनच पुढे आणीबाणी लागू करण्यात आली, असे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी सांगितले.

थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली

सन १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवणारा निकाल दिल्यामुळे देशाला मोठा हादरा बसला. हा अतिशय धाडसी निर्णय होता व त्याचा थेट परिणाम म्हणून आणीबाणी जाहीर झाली, असे म्हणता येऊ शकते. त्याच्या परिणामांबाबत मी आता चर्चा करू इच्छित नाही, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाला मोठा इतिहास आहे. देशातील महान कायदेतज्ज्ञ अलाहाबाद येथून देशाला लाभले, असेही न्या. रमणा यांनी यावेळी बोलताना नमूद केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाIndira Gandhiइंदिरा गांधी