शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

“मानवाधिकारांना पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक धोका, कोठड्यांमधील छळ कायम”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:28 IST

पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे न्या. रमणा यांनी सांगितले.

नवी दिल्ली: मानवाधिकारांना असणारा धोका पोलीस ठाण्यांमध्येच सर्वाधिक आहे. कोठड्यांमधील छळ आणि अन्य त्रास आजही कायम आहेत. घटनात्मक हमी दिल्यानंतरही अटकेतील किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पोलीस ठाण्यांमध्ये कायद्याचा पुरेसा आधार मिळताना दिसत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटले आहे. (cji nv ramana says big threat to human rights in police stations and persecution in prison cells continues)

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाने तयार केलेल्या मोबाइल अॅपच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. कायद्यावर चालणारा समाज तयार होण्यासाठी समाजातील दोन स्तरांमध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टीने असणारी दरी कमी करणे गरजेचे आहे. न्यायसंस्थेवर सामान्यांचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीला तेथून न्याय मिळण्याची हमी मिळायला हवी. दीर्घकाळ समाजातील असुरक्षित लोकसंख्या या न्यायव्यवस्थेच्या परिघाबाहेर राहिली असल्याचे न्या. रमणा म्हणाले. 

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

पोलिसांमध्ये जागृती निर्माण व्हावी

कोठड्यांमधील छळ आणि पोलिसांकडून अन्य प्रकारे होणारा त्रास आजही देशामध्ये दिसून येतो. अनेकवेळा विशेष अधिकार असणाऱ्या व्यक्तीही या छळातून सुटत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे न्या. रमणा यांनी सांगितले. दुसरीकडे, आम्ही केलेल्या तक्रारींवर सीबीआयचे सहकार्य मिळत नाही, या काही न्यायाधीशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश रमणा यांनी सीबीआय आणि आयबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या दृष्टीने न्यायसंस्था महत्त्वाची नाही. आयबी आणि सीबीआयचे न्यायसंस्थेस बिलकूल सहकार्य मिळत नाही. हे अतिशय जबाबदारीने सांगत आहे, असे न्या. रमणा यांनी नमूद केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार