शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

“मानवाधिकारांना पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक धोका, कोठड्यांमधील छळ कायम”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:28 IST

पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे न्या. रमणा यांनी सांगितले.

नवी दिल्ली: मानवाधिकारांना असणारा धोका पोलीस ठाण्यांमध्येच सर्वाधिक आहे. कोठड्यांमधील छळ आणि अन्य त्रास आजही कायम आहेत. घटनात्मक हमी दिल्यानंतरही अटकेतील किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पोलीस ठाण्यांमध्ये कायद्याचा पुरेसा आधार मिळताना दिसत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटले आहे. (cji nv ramana says big threat to human rights in police stations and persecution in prison cells continues)

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाने तयार केलेल्या मोबाइल अॅपच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. कायद्यावर चालणारा समाज तयार होण्यासाठी समाजातील दोन स्तरांमध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टीने असणारी दरी कमी करणे गरजेचे आहे. न्यायसंस्थेवर सामान्यांचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीला तेथून न्याय मिळण्याची हमी मिळायला हवी. दीर्घकाळ समाजातील असुरक्षित लोकसंख्या या न्यायव्यवस्थेच्या परिघाबाहेर राहिली असल्याचे न्या. रमणा म्हणाले. 

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

पोलिसांमध्ये जागृती निर्माण व्हावी

कोठड्यांमधील छळ आणि पोलिसांकडून अन्य प्रकारे होणारा त्रास आजही देशामध्ये दिसून येतो. अनेकवेळा विशेष अधिकार असणाऱ्या व्यक्तीही या छळातून सुटत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे न्या. रमणा यांनी सांगितले. दुसरीकडे, आम्ही केलेल्या तक्रारींवर सीबीआयचे सहकार्य मिळत नाही, या काही न्यायाधीशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश रमणा यांनी सीबीआय आणि आयबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या दृष्टीने न्यायसंस्था महत्त्वाची नाही. आयबी आणि सीबीआयचे न्यायसंस्थेस बिलकूल सहकार्य मिळत नाही. हे अतिशय जबाबदारीने सांगत आहे, असे न्या. रमणा यांनी नमूद केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार