शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

CAB Act : मोदी सरकारच्या नागरिकत्व कायद्यावर तस्लीमा नसरीन यांची 'मन की बात'  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 6:36 PM

CAB Act : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं आहे. 

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं. निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे. हा कायदा मुस्लिमविरोधी नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला यश आलं आहे. राज्यसभेत स्पष्ट बहुमत नसतानाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक मंजूर करून दाखवलं आणि त्यावर लगेचच राष्ट्रपतींनी स्वाक्षरीही केली. त्याचे तीव्र पडसाद ईशान्य भारतात उमटत आहेत, अनेक राज्यांमधूनही त्याला विरोध होतोय. परंतु, निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे. 

अल्पसंख्याक समाजावर अन्याय-अत्याचार होतात, हे वास्तव आहे. आम्ही त्यावर टीका केली तर मुस्लिम धर्मीय आमचाही तिरस्कार करतात. अशा पीडित अल्पसंख्याकांना हा नागरिकत्व कायदा नक्कीच आधार देणारा आहे. सरकारने तो मंजूर केल्यानं मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया तस्लीमा नसरीन यांनी व्यक्त केली आहे. हा कायदा मुस्लिमविरोधी नाही, भारतातील देशातील मुस्लिमांची संख्या कमी करण्याचा हा प्रयत्न नाही, असंही त्यांनी नमूद केलं. उलट, आमच्यासारख्यांनाही भारताने नागरिकता द्यावी, अशी सूचना त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. मलाही घराची आठवण येतेय, मी बंगाललाही जाऊ शकत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

अयोध्येच्या निकालानंतरही केलं होतं ट्विट

विविध सामाजिक, राजकीय विषयांवर तस्लीमा नसरीन परखड मतं मांडतात. अनेकदा त्यावरून वादही निर्माण झाले आहेत. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यावर त्यांनी केलेलं ट्विटही चर्चेत आलं होतं. '२.७७ एकर जमीन हिंदूंना देण्यात आली. मुस्लिमांनाही २.७७ एकरच द्यायला हवी होती. त्यांना ५ एकर का?', असा प्रश्न त्यांनी केला होता.

 

जायरा वसीमचेही घेतली होती 'शाळा'!

'दंगल'फेम अभिनत्री जायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तस्लीमा नसरीन यांनी तिची शाळाच घेतली होती. धर्माच्या कारणास्तव हा निर्णय घेणं म्हणजे मूर्खपणा असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. मुस्लिम धर्मामध्ये अनेक प्रतिभावंतांना बुरख्याच्या अंधारात जावं लागतं, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. 

विधेयकावरून आसाम, त्रिपुरामध्ये हिंसाचार

आमच्या राज्यांमध्ये अन्य देशांतील शरणार्थींना स्थान देऊ न आमची संस्कृती व अस्तित्व संपवू नका आणि त्यांना आमच्या राज्यांत आणून देशाचे नागरिकत्व देण्यासाठीचे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ताबडतोब मागे घ्या, या मागणीसाठी ईशान्येकडील राज्यांत सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं आहे. 

काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा!

१९५५ ला कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी भारताला खेटून असलेल्या म्हणजेच शेजारील असलेल्या राज्यांमधून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची तरतूद करण्यात आली. ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी ज्या निर्वासितांनी येऊन भारतात वास्तव्य केलेलं आहे, अशा मुस्लिमेतर म्हणजेच हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन अल्पसंख्याक लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल केले जाते. भारताचा नागरिक होण्यासाठी ११ वर्षं देशात राहणे आवश्यक असल्याचंही संविधानात नमूद आहे. पण मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या या सुधारणेनंतर जे मुस्लिमेतर अल्पसंख्याक निर्वासित ६ वर्षांहून अधिक काळ भारतात राहिलेले आहेत, अशांना हे भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. भाजपाच्या दृष्टीने या कायद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा