शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

Citizenship Amendment Bill: नागरिकत्व विधेयकावरून आसाममध्ये तणाव; गुवाहाटीत २ जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 05:59 IST

इंटरनेट आणखी ४८ तास बंद राहणार; रेल्वे सेवेलाही फटका

गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाम, मेघालय, त्रिपुरा यासह ईशान्यकडील राज्यातून विरोध सुरुच आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. गुरुवारी गुवाहाटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दोन जण मरण पावले आहेत. जमावाने चौबा आणि पनीतोला रेल्वे स्थानकांवर जाळपोळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आसामच्या लखीमपूर, धेमाजी, तिनसुकिया, डिब्रूगड, चराइदेव, शिवसागर, जोरहाट, गोलाघाट, कामरूपमध्ये आदी १० जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवांवर लावलेले प्रतिबंध आणखी ४८ तासांसाठी वाढविले आहेत. आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत. त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. आंदोलनामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आसाम व त्रिपुरामधील रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे प्रवक्ते शुभानन चंदा यांनी दिली. रेल्वेसेवा बंद झाल्यामुळे गुवाहाटी, कामाख्या रेल्वेस्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. दिब्रुगढ येथील चाबुआ व तीनसुकिया जिल्ह्यातील पनितोला येथील रेल्वेस्थानकाला आंदोलकांनी बुधवारी रात्री आग लावली. या दोन्ही परिसरात रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या १२ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवून त्यांच्या जागी मुन्ना प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यापूर्वी एसपीजीमध्ये कार्यरत होते. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जी.पी. सिंह यांच्याकडे पदभार सोपविला आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द

दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांचा धार्मिक छळ होतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले विधान चुकीचे आहे अशी टीका केल्यानंतर त्याच्या दुसºयाच दिवशी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी आपली भारत भेट रद्द केली आहे. गुरुवारपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार होता.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात म्हटले आहे की, या विधेयकामुळे संविधानातील मौलिक अधिकारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. धर्माच्या आधारावर एका गटाला वेगळे ठेवून अवैधरीत्या आश्रयास असलेल्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामPoliceपोलिस