शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

Citizenship Amendment Bill: नागरिकत्व विधेयकावरून आसाममध्ये तणाव; गुवाहाटीत २ जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 05:59 IST

इंटरनेट आणखी ४८ तास बंद राहणार; रेल्वे सेवेलाही फटका

गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाम, मेघालय, त्रिपुरा यासह ईशान्यकडील राज्यातून विरोध सुरुच आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. गुरुवारी गुवाहाटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दोन जण मरण पावले आहेत. जमावाने चौबा आणि पनीतोला रेल्वे स्थानकांवर जाळपोळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आसामच्या लखीमपूर, धेमाजी, तिनसुकिया, डिब्रूगड, चराइदेव, शिवसागर, जोरहाट, गोलाघाट, कामरूपमध्ये आदी १० जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवांवर लावलेले प्रतिबंध आणखी ४८ तासांसाठी वाढविले आहेत. आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत. त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. आंदोलनामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आसाम व त्रिपुरामधील रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे प्रवक्ते शुभानन चंदा यांनी दिली. रेल्वेसेवा बंद झाल्यामुळे गुवाहाटी, कामाख्या रेल्वेस्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. दिब्रुगढ येथील चाबुआ व तीनसुकिया जिल्ह्यातील पनितोला येथील रेल्वेस्थानकाला आंदोलकांनी बुधवारी रात्री आग लावली. या दोन्ही परिसरात रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या १२ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवून त्यांच्या जागी मुन्ना प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यापूर्वी एसपीजीमध्ये कार्यरत होते. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जी.पी. सिंह यांच्याकडे पदभार सोपविला आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द

दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांचा धार्मिक छळ होतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले विधान चुकीचे आहे अशी टीका केल्यानंतर त्याच्या दुसºयाच दिवशी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी आपली भारत भेट रद्द केली आहे. गुरुवारपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार होता.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात म्हटले आहे की, या विधेयकामुळे संविधानातील मौलिक अधिकारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. धर्माच्या आधारावर एका गटाला वेगळे ठेवून अवैधरीत्या आश्रयास असलेल्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामPoliceपोलिस