शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

Citizenship Amendment Bill: नागरिकत्व विधेयकावरून आसाममध्ये तणाव; गुवाहाटीत २ जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 05:59 IST

इंटरनेट आणखी ४८ तास बंद राहणार; रेल्वे सेवेलाही फटका

गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आसाम, मेघालय, त्रिपुरा यासह ईशान्यकडील राज्यातून विरोध सुरुच आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. गुरुवारी गुवाहाटीत पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दोन जण मरण पावले आहेत. जमावाने चौबा आणि पनीतोला रेल्वे स्थानकांवर जाळपोळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आसामच्या लखीमपूर, धेमाजी, तिनसुकिया, डिब्रूगड, चराइदेव, शिवसागर, जोरहाट, गोलाघाट, कामरूपमध्ये आदी १० जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवांवर लावलेले प्रतिबंध आणखी ४८ तासांसाठी वाढविले आहेत. आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत. त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. आंदोलनामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आसाम व त्रिपुरामधील रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेचे प्रवक्ते शुभानन चंदा यांनी दिली. रेल्वेसेवा बंद झाल्यामुळे गुवाहाटी, कामाख्या रेल्वेस्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. दिब्रुगढ येथील चाबुआ व तीनसुकिया जिल्ह्यातील पनितोला येथील रेल्वेस्थानकाला आंदोलकांनी बुधवारी रात्री आग लावली. या दोन्ही परिसरात रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या १२ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवून त्यांच्या जागी मुन्ना प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यापूर्वी एसपीजीमध्ये कार्यरत होते. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जी.पी. सिंह यांच्याकडे पदभार सोपविला आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द

दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांचा धार्मिक छळ होतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले विधान चुकीचे आहे अशी टीका केल्यानंतर त्याच्या दुसºयाच दिवशी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी आपली भारत भेट रद्द केली आहे. गुरुवारपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार होता.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला इंडियन युनियन मुस्लिम लीगने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात म्हटले आहे की, या विधेयकामुळे संविधानातील मौलिक अधिकारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. धर्माच्या आधारावर एका गटाला वेगळे ठेवून अवैधरीत्या आश्रयास असलेल्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामPoliceपोलिस