शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अ‍ॅप्सवरील मोफत कॉलवर गंडांतर

By admin | Updated: July 17, 2015 04:22 IST

स्काईप, व्हॉटस् अ‍ॅप आणि व्हायबरसारख्या अ‍ॅपच्या साह्याने इंटरनेटवरील स्थानिक कॉलवर नियमन आणले जावे, असे इंटरनेट तटस्थतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या

नवी दिल्ली : स्काईप, व्हॉटस् अ‍ॅप आणि व्हायबरसारख्या अ‍ॅपच्या साह्याने इंटरनेटवरील स्थानिक कॉलवर नियमन आणले जावे, असे इंटरनेट तटस्थतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी समितीने(डीओटी) सुचविले आहे. दूरसंचार सेवा कंपन्यांकडून सामान्य कॉलवर ज्या प्रकारे नियमन आणले जाते तसाच दर्जा इंटरनेटवरील स्थानिक कॉललाही दिला जावा. फेसबुकवरील इंटरनेट आॅर्गसारख्या योजनांवर प्रतिबंध घालण्यात यावा, अशी शिफारसही समितीने केली आहे.काही वेबसाईटमार्फत केल्या जाणाऱ्या संपर्कासाठी ग्राहकांकडून मोबाईल डाटासाठी शुल्क आकारले जात नाही. एअरटेल झीरोसारख्या सवलतींच्या योजना आणताना दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून(ट्राय) पूर्वपरवानगी बंधनकारक केली जावी, असेही या समितीने सुचविले आहे. दूरसंचारचे तांत्रिक सल्लागार ए.के. भार्गव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने ‘ओव्हर दी टॉप व्हाईस आॅन इंटनरेट प्रोटोकॉल’ (ओटीटी)सारख्या सुविधा देताना आंतरराष्ट्रीय कॉलबाबत उदारतावादी दृष्टिकोन अवलंबला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलबाबत दूरसंचार सेवादात्या कंपन्यांकडून दिली जाणारी सेवा पाहता ओटीटी कॉलवरही समान नियमन आणले जाण्याची गरज या समितीने प्रतिपादित केली.नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय?नेट न्यूट्रॅलिटी किंवा इंटरनेट तटस्थतेची साधी व्याख्या करताना इंटरनेटवरील सर्व प्रकारचे ध्वनी आणि आकड्यांचा प्रसार करताना समान व्यवहार केला जावा, असा अर्थ अभिप्रेत आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत कोणत्याही दूरसंचार सेवादात्या कंपनीला अधिक प्राधान्य दिले जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भार्गव यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ए.के. मित्तल, व्ही. उमाशंकर, शशिरंजन कुमार, जी. नरेंद्रनाथ आणि आर.एम. अगरवाल यांचा समावेश आहे. एअरटेल झीरोमुळे वादएअरटेल झीरोअंतर्गत वेबसाईटच्या माध्यमातून मुक्तसंचार सुरू झाल्यानंतर देशात नेट न्यूट्रॅलिटीचा वाद छेडला गेला. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना ही सुविधा देण्यासाठी एअरटेलने पैसा मागितल्यानंतर दूरसंचार कंपन्यांच्या संघर्षात भर पडली. त्यानंतर फेसबुक इंटरनेट आॅर्गकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर सदर समितीने चर्चा केली. इंटरनेट आॅर्ग युझर्सना एप्रिल २०१५ पर्यंत काही मोजक्या वेबसाईटच्या माध्यमातून मुक्त संचाराची मुभा देण्यात आली. नेट न्यूट्रॅलिटीचे कुणाकडून उल्लंघन होत आहे याकडे द्वारपालासारखे लक्ष देण्याचे काम फेसबुकवर सोपविण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त व्हॉटस् अ‍ॅप आणि स्काईप अथवा तत्सम अ‍ॅपवरून कॉलची मोफत सुविधा बंद करण्याची शिफारस जरी दूरसंचार विभागाच्या समितीने केली असली तरी, याचसोबत या प्रस्तावामध्ये अ‍ॅपवरून होणाऱ्या सेवा सशुल्क करण्याचाही पर्याय देण्यात आला होता.मुळात यावर आक्षेप नोंदविला होता तो देशातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी. त्यांचे म्हणणे असे होते की, आम्ही जी कॉलिंग सेवा देतो, ती देण्यासाठी तांत्रिक पूर्ततेकरिता आम्हाला स्पेक्ट्रमची आवश्यकता भासते आणि या स्पेक्ट्रमची खरेदी लीलाव प्रक्रियेने होत असल्याने त्याची किंमत मोठी आहे. या तुलनेत अ‍ॅपच्या माध्यमातून पुरविली जाणारी कॉलिंग सेवा ही इंटरनेटच्या साह्याने पुरविली जाते. त्यांना स्पेक्ट्रम अथवा अन्य शुल्क भरणा करावा लागत नाही. त्यामुळे या दोघांतील ही विसंगती मिटविण्यासाठी एकतर अशा अ‍ॅपवर बंदी आणावी; अथवा दूरसंचार कंपन्यांप्रमाणेच त्यांच्याकडून शुल्क आकारणी करावी. मात्र, आता अंतिम अहवालात अ‍ॅपवरील कॉलिंग सेवेवर सरसकटच बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.