शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 11:44 IST

Food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick : लग्नाच्या जेवणातून तब्बल 100 लोकांना विषबाधा झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्नाच्या जेवणातून तब्बल 100 लोकांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यामध्ये 45 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. तसेच आजारी लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींसह मुलीच्या कुटुंबातील लोक देखील विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना विषबाधा झाली. उपचारासाठी लोकांना शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सरदारशहरमध्ये कालू कुचामणिया यांच्या चार मुलींचं एकाच दिवशी लग्न होतं. दोन नवरदेव बीदासर, एक नवरदेव लाडनू आणि एक जोधपुरहून आपल्या नातेवाईकांना घेऊन सरदारशहर येथे आले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत लग्न आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वऱ्हाड निघून गेलं आणि अनेकांना पोटदुखी, उलटी आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना मिळेल त्या वाहनाने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

रुग्णालयात रात्रभर एकामागे एक रुग्णांना दाखल करण्यात येत होतं. यामध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला आणि पुरुष सर्वांचा समावेश होता. एकाचवेळी रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेड कमी पडले. तर आरोग्य अधिकाऱ्यांवर रुग्णांना अगदी जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ आली. काही रुग्ण गंभीर होते त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वऱ्हाडातील अनेकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ते लोक आपापल्या गावी निघून गेल्याने त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 बापरे! कोरोना लसीसाठी चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, हाणामारी; 25 जण जखमी

देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये शेकडो नागरिकांनी लसीकरण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, लसीसाठी झालेल्या या चेंगराचेंगरीत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धूपगुडी आरोग्य केंद्राचा मुख्य दरवाजा उघडताच बाहेर जमलेल्या लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्नfood poisoningअन्नातून विषबाधाfoodअन्नhospitalहॉस्पिटल