शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चिनम्माचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार ?

By admin | Updated: February 7, 2017 08:53 IST

अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्हीके शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पण...

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 7 - अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्हीके शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पण त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या न्यायालयीन खटल्यांमुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. शशिकला यांच्या विरोधातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवडयात निकाल सुनावणार आहे. 
 
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि शशिकला यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या आरोपातून सुटका झाली होती. या सुटकेला आव्हान देणा-या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. निकाल विरुद्ध लागला तर, त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि राज्यात राजकीय अस्थिरताही निर्माण होईल. 
 
66.65 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता, शिशकला, व्हीएन सुधाकरन आणि ईलावारासी हे चौघे आरोपी होते. या चौघांची न्यायालयाने सुटका केली पण या सुटकेला आव्हान देण्यात आले. मागच्यावर्षीय 7 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर रावही नवी दिल्लीहून थेट मुंबईला आले आहेत. ते तूर्तास तामिळनाडूला जाण्याची कोणतीही योजना नाही. त्यामुळे चिनाम्मा म्हणजेच शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला विलंब लागू शकतो.  
 
आताच जयललिता यांच्या मृत्यूबद्दल खुलासा का ? 
शशिकला यांच्या शपथविधीपूर्वी अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पत्रकारपरिषद घेऊन जयललिता यांचा मृत्यू रक्तातील संसर्गामुळे झाल्याचे सांगितले. जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी अनेकांना संशय असून, विविध अफवा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. पण जयललिता यांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी हा खुलासा का केला ? त्याची आता काय गरज निर्माण झाली ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.