शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अरुणाचलच्या सीमेवर चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्याला हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:34 AM

लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एलएसीजवळील केवळ २० किलोमीटर अंतरावर चीनने बांधकामही सुरू केल्याने भारताच्या बाजूने सतर्कता बाळगण्यात येत आहे. लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.अरुणाचल प्रदेशच्या असाफिला, तुतिंग, चांग त्से व फिशटेल-२ सेक्टरमध्ये चीनच्या सैन्याची जमवाजमव सुरू आहे. विशेष म्हणजे हा भाग एलएसीपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे व तेथे चीनने काही बांधकामही सुरू केलेले आहे. या ठिकाणी चीनने कोणतीही आगळीक केली तरी भारत त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे व भारतानेही या भागात आपली तैनाती वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे लडाखजवळील स्पांगूर गॅपमध्येही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तेथे चीनने रणगाडे, तोफा व सैनिकांची तैनाती केली आहे. भारतानेही आपल्या बाजूने तेथे पूर्ण सज्जता केली आहे. त्यापाठोपाठ आता अरुणाचलातही दोन्ही सैन्य समोरासमोर उभे राहण्याची शक्यता आहे.संरक्षणमंत्री : भारतीय जवान सज्जभारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांत रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या वेळी चीनचे ६० पेक्षा अधिक सैनिक भारताने ठार केल्याचे आता समोर आले आहे. तो कट भारताने हाणून पाडल्यानेच चीनकडून आता अरुणाचलात दुसरा कट रचला जातोय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.चीनचे सैनिक गस्त घालण्यासाठी एलएसीच्या अगदी जवळ येत असल्याचेही निरीक्षण भारताने नोंदवलेले आहे. तसेच चीनकडून होत असलेल्या बांधकामाचीही गंभीर नोंद घेतलेली आहे.काही वर्षांपूर्वी चीनने डोकलाम भागात भूतानच्या भूभागावर रस्ते बांधल्याने भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होत आहे, असेही भारताने म्हटले होते.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन