शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"चिनी लोकांनी १९६२ मध्ये भारतावर ‘कथित’ हल्ला केला"; मणिशंकर अय्यर पुन्हा अडकले वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:55 IST

मागितली बिनशर्त माफी; भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मंगळवारी १९६२ च्या चिनी आक्रमणाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘कथित’ हा शब्द वापरला आणि नंतर त्याबद्दल बिनशर्त माफीही मागितली. यावरून भाजपने मात्र काँग्रेसवर जोरदार टीका केली. व्हिडीओनुसार अय्यर एक किस्सा सांगताना म्हणाले, ‘ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी भारतावर कथित हल्ला केला.’ नंतर एका संक्षिप्त निवेदनात अय्यर म्हणाले, ‘चिनी हल्ल्यापूर्वी कथित शब्द चुकून वापरल्याबद्दल मी माफी मागतो.’

‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी हे भाष्य करून वाद ओढवून घेतला. त्यांच्या या शब्दप्रयोगाने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना सूट देण्यात यावी. काँग्रेसने त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे.”

आयएफएस उच्च जातीची सेवा

पूर्वी आयएफएस ही ‘मेकॉलेच्या मुलांची’ उच्च जातीची सेवा मानली जात होती; परंतु आता ती अधिक लोकशाहीवादी बनली आहे. परराष्ट्र सेवेत संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व दिसते आणि मला वाटते की, ही खूप चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची ‘भारतविरोधी’ मानसिकता दर्शवते: भाजप

मणिशंकर अय्यर यांचे विधान काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता दर्शवते आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव होत असताना शत्रुराष्ट्र निवडणुकांत हस्तक्षेप करीत असल्याचे संकेत यावरून मिळतात, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. अय्यर हे राहुल गांधींच्या संमतीशिवाय असे विधान करू शकणार नाहीत, असे सांगत त्यांनी खरगे यांच्या मौनाबद्दलही टीका केली.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर