शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

दुबळ्या धोरणांमुळेच चीनची सीमेत घुसखोरी; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 06:44 IST

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सिक्कीमला खेटून असलेल्या चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या ताज्या घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करताना म्हटले की, सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळेच चीनला भारतीय सीमेत घुसून कब्ज़ा करण्याची संधी मिळत आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही. ते किमान चीन शब्द उच्चारून सुरुवात करू शकतात.” गांधी यांची अशीही टिप्पणी होती की, सरकारचे काम होते ते चीनला सीमेवर रोखण्याचे. सत्याग्रही अन्नदात्यांना दिल्ली सीमेवर अडविण्याचे नाही. राहुल गांधी यांनी सतत चीनवरून मोदी सरकारवर हल्ले केले व चीनने भारतीय सीमेत शिरून कब्जा केल्याचे आरोप केले आहेत. सरकार मात्र ते फेटाळत आहेत. आजही सेनेकडून नाथुला सीमेवर चीन आणि भारतीय सेनेत झालेली झडप ही एक आठवड्यापूर्वीची असल्याचे सांगितले जाते. 

चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावेकाँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सल्ला दिला की, मोदी यांनी चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावे. त्यांनी मोदी यांच्यावर आरोप केला की, “देशाच्या सीमेत चिनी अतिक्रमण आणि घुसखोरीवर पंतप्रधानांच्या गूढ मौनामुळे शत्रूचा आत्मविश्वास वाढत आहे. चीनला घाबरू नका. संपूर्ण देश मजबुतीने लढेल. परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगा. राष्ट्रीय सुरक्षा हा लपाछपीचा खेळ नाही. परिस्थिती गंभीर आहे.”

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारchinaचीन