शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

दुबळ्या धोरणांमुळेच चीनची सीमेत घुसखोरी; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 06:44 IST

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सिक्कीमला खेटून असलेल्या चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या ताज्या घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करताना म्हटले की, सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळेच चीनला भारतीय सीमेत घुसून कब्ज़ा करण्याची संधी मिळत आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही. ते किमान चीन शब्द उच्चारून सुरुवात करू शकतात.” गांधी यांची अशीही टिप्पणी होती की, सरकारचे काम होते ते चीनला सीमेवर रोखण्याचे. सत्याग्रही अन्नदात्यांना दिल्ली सीमेवर अडविण्याचे नाही. राहुल गांधी यांनी सतत चीनवरून मोदी सरकारवर हल्ले केले व चीनने भारतीय सीमेत शिरून कब्जा केल्याचे आरोप केले आहेत. सरकार मात्र ते फेटाळत आहेत. आजही सेनेकडून नाथुला सीमेवर चीन आणि भारतीय सेनेत झालेली झडप ही एक आठवड्यापूर्वीची असल्याचे सांगितले जाते. 

चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावेकाँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सल्ला दिला की, मोदी यांनी चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावे. त्यांनी मोदी यांच्यावर आरोप केला की, “देशाच्या सीमेत चिनी अतिक्रमण आणि घुसखोरीवर पंतप्रधानांच्या गूढ मौनामुळे शत्रूचा आत्मविश्वास वाढत आहे. चीनला घाबरू नका. संपूर्ण देश मजबुतीने लढेल. परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगा. राष्ट्रीय सुरक्षा हा लपाछपीचा खेळ नाही. परिस्थिती गंभीर आहे.”

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारchinaचीन