शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 20:44 IST

लडाखमधील तणाव वाढला असताना भारतानं चीनच्या ५९ अ‍ॅप बंदीवर घातली

नवी दिल्ली: लडाखमधील तणाव वाढल्यानंतर भारतानं चीनला आर्थिक झटका देण्यासाठी ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामुळे चीनला मोठा धक्का बसला असून प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. भारतानं सर्व आघाड्यांवर चीनला धक्के दिल्यानंतर अखेर चीननं गलवान खोऱ्यातून माघार घेतली. मात्र भारतानं दिलेल्या धक्क्यानं चीन मेटाकुटीला आला आहे. आज भारत आणि चीनमध्ये राजदूत स्तरावर चर्चा झाली. त्यामध्ये चीननं अ‍ॅप्सवरील बंदीबद्दल आक्षेप नोंदवला. मात्र भारतानं ही कारवाई सुरक्षेच्या कारणांवरून केल्याचं स्पष्ट केलं. आमच्या नागरिकांच्या तपशीलाशी छेडछाड होऊ नये, यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचं भारताकडून चीनला सांगण्यात आलं. मोदी सरकारनं गेल्याच महिन्यात ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊजर आणि शेअर इटसारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.आज झालेल्या बैठकीत चिनी राजदूतांनी अ‍ॅप्सवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. अ‍ॅप्सवरील बंदी ते चिनी असल्यानं घातलेले नसून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्यानं घातले आहेत, असं उत्तर भारताकडून चीनला देण्यात आलं. भारताकडून अ‍ॅप्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानं ते गुगल स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आले.चिनी अ‍ॅप्समुळे धोका का असतो?चिनी अ‍ॅप्समुळे सर्वात धोका प्रायव्हसीला असतो. तुम्ही काय टाईप करता, तुम्ही काय बोलता, ही सगळी माहिती चिनी अ‍ॅप्स साठवतात. याशिवाय चिनी अ‍ॅप्समुळे सुरक्षेलाही धोका असतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये चिनी अ‍ॅप्स असल्यास देशाची गोपनीय माहिती शत्रूच्या हाती लागू शकते. भारतीय तरुणाई मोठ्या प्रमाणात चिनी अ‍ॅप्सचा वापर करते. त्यामुळे कंपन्यांना मोठं उत्पन्न मिळतं. 

टॅग्स :chinaचीनTik Tok Appटिक-टॉकladakhलडाख