शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 20:44 IST

लडाखमधील तणाव वाढला असताना भारतानं चीनच्या ५९ अ‍ॅप बंदीवर घातली

नवी दिल्ली: लडाखमधील तणाव वाढल्यानंतर भारतानं चीनला आर्थिक झटका देण्यासाठी ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामुळे चीनला मोठा धक्का बसला असून प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. भारतानं सर्व आघाड्यांवर चीनला धक्के दिल्यानंतर अखेर चीननं गलवान खोऱ्यातून माघार घेतली. मात्र भारतानं दिलेल्या धक्क्यानं चीन मेटाकुटीला आला आहे. आज भारत आणि चीनमध्ये राजदूत स्तरावर चर्चा झाली. त्यामध्ये चीननं अ‍ॅप्सवरील बंदीबद्दल आक्षेप नोंदवला. मात्र भारतानं ही कारवाई सुरक्षेच्या कारणांवरून केल्याचं स्पष्ट केलं. आमच्या नागरिकांच्या तपशीलाशी छेडछाड होऊ नये, यासाठी पाऊल उचलण्यात आल्याचं भारताकडून चीनला सांगण्यात आलं. मोदी सरकारनं गेल्याच महिन्यात ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊजर आणि शेअर इटसारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.आज झालेल्या बैठकीत चिनी राजदूतांनी अ‍ॅप्सवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. अ‍ॅप्सवरील बंदी ते चिनी असल्यानं घातलेले नसून त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्यानं घातले आहेत, असं उत्तर भारताकडून चीनला देण्यात आलं. भारताकडून अ‍ॅप्सच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानं ते गुगल स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आले.चिनी अ‍ॅप्समुळे धोका का असतो?चिनी अ‍ॅप्समुळे सर्वात धोका प्रायव्हसीला असतो. तुम्ही काय टाईप करता, तुम्ही काय बोलता, ही सगळी माहिती चिनी अ‍ॅप्स साठवतात. याशिवाय चिनी अ‍ॅप्समुळे सुरक्षेलाही धोका असतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये चिनी अ‍ॅप्स असल्यास देशाची गोपनीय माहिती शत्रूच्या हाती लागू शकते. भारतीय तरुणाई मोठ्या प्रमाणात चिनी अ‍ॅप्सचा वापर करते. त्यामुळे कंपन्यांना मोठं उत्पन्न मिळतं. 

टॅग्स :chinaचीनTik Tok Appटिक-टॉकladakhलडाख