शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

चीनकडून युद्धाची तयारी? भारताच्या तीन राज्यांच्या सीमेवर सैनिकांसह मोठ्या प्रमाणात तैनात केली शस्रास्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 17:21 IST

गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये पीएलएच्या सैनिकांची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढलीपँगाँग सरोवर, गलवान खोऱ्यासोबतच पूर्व लडाखमधील काही भागात चीनच्या सैनिकांची संख्या वाढत आहेभारताच्या तीव्र विरोधानंतरही पॉईंट-१४ जवळ चीनने पुन्हा एकदा बांधकाम केले आहे

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये पीएलएच्या सैनिकांची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढत आहे.

एका रिपोर्टनुसार पँगाँग सरोवर, गलवान खोऱ्यासोबतच पूर्व लडाखमधील काही भागात चीनच्या सैनिकांची संख्या वाढत आहे. गलवानसोबतच डेमचोक आणि दौलत बेग ओल्डीमध्येसुद्धा भारत आणि चीनचे सैनिका आमनेसामने आलेले आहेत. बुधवारी भारत आणि चीनमध्ये राजनयिक स्तरावरील चर्चा झाली होती. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी चीनच्या पीपल्स लीबरेशन आर्मीच्या सैनिकांनी भारताच्या जवानांवर पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला केला होता. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले आहे.  

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पेंगाँग सरोवर, गलवान खोरे आणि पूर्व लडाखमधील संवेदनशील भागात चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच भारताच्या तीव्र विरोधानंतरही पॉईंट-१४ जवळ चीनने पुन्हा एकदा बांधकाम केले आहे. मात्र या वृत्तानुसार सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांना लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात सैनिक, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचे प्रमाण वाढवले आहे.  

दरम्यान, दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचि (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील डीडी वू जियांगहाओ यांच्यात बुधवारी चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करावे आणि त्याचा सन्मान करावा असे निश्चित झाले होते. तत्पूर्वी २२ जून रोजी भारताच्या १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टिनंट हरिंदर सिंह आणि तिबेट मिलिट्री डिस्ट्रिक्टचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांच्या ११ तास मॅरथॉन बैठक पार पडली होती.   

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनwarयुद्धArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशsikkimसिक्किम