शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

पाकिस्तानच्या मदतीसाठी चीन पाठवणार 1 लाखांची 'स्पेशल फोर्स'; जाणून घ्या नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 9:59 AM

अलीकडेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि येमेन हे टोळांचे प्रजनन केंद्र मानले जातेबदके कोंबड्यांपेक्षा तीनपट टोळ खाऊ शकतात.टोळांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील संपूर्ण पीके नष्ट केली

बीजिंग - अडचणीत सापडलेल्या मित्र पाकिस्तानच्या मदतीसाठी चीनने पुढाकार घेतला आहे. सध्या टोळ कीटकांमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. या कीटकांचा सामना करण्यासाठी चीनने पाकिस्तानला १ लाख बदकांची फौज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  

स्थानिक वृत्तपत्र निंगो इव्हनिंगने दिलेल्या वृत्तानुसार चीन पूर्वेकडील झेजियांग प्रांतातून टोळ खाणाऱ्या बदकांना पाकिस्तानात पाठवले जाणार आहे. एक बदक साधारणपणे दिवसाला सुमारे २०० टोळ कीटक खाऊ शकतो. अशा परिस्थितीत ही १ लाख बदकांची फौज दिवसाला २ कोटी टोळ कीटकांना फस्त करु शकते असा विश्वास चीनच्या अधिकाऱ्यांना वाटतो. 

तसेच दोन दशकांपूर्वी चीनच्या वायव्य भागात टोळ कीटकांनी हल्ला केला होता, त्यावेळी बदकांच्या मदतीने चीनने या संकटांवर मात केली होती. कृषी तत्रज्ञान तज्ज्ञ लू लिझी सांगतात की, बदकाचा वापर विषारी कीटकनाशकांच्या वापरापेक्षा खूपच स्वस्त असतो आणि त्यामुळे शेतीलाही नुकसान होत नाही. तसेच त्यांचा वापर पूर्णपणे नैसर्गिक आहे. बदके कोंबड्यांपेक्षा तीनपट टोळ खाऊ शकतात.

तसेच बदकांना एका गटात रहायला आवडते, म्हणून कोंबडीपेक्षा त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. एक कोंबडी फक्त 70 टोळ खाऊ शकते तर त्या तुलनेत बदक दररोज 200 टोळ खाण्यास सक्षम आहे, गतवर्षी टोळ कीटकांनी पाकिस्तानवर आक्रमण केले होते. 

अलीकडेच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या टोळांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील संपूर्ण पीके नष्ट केली. पंतप्रधान इम्रान खान यांनी कीटकांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि येमेन हे टोळांचे प्रजनन केंद्र मानले जाते. येथे हिवाळ्यामध्ये टोळ किड्यांची पैदास होते. वारा बदलताच पाकिस्तान व इतर भागातून टोळ कीटक भारतात प्रवेश करतात. पावसामध्ये पाकिस्तानहून भारताकडे हे कीटक पोहचतात. टोळ नियंत्रणात पाकिस्तानकडे प्रभावी व्यवस्थापन नाही.

टोळ कीटक काय असतात? टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्यांपैकी भारतात खुरपाडी, बिनपंखी नाकतोडा, पट्टेदार नाकतोडा, भातावरील नाकतोडा इ. नाकतोडे पिकांची हानी करतात. 

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तानagricultureशेती