शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:07 IST

Court: आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

चेन्नई : आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.कोर्टाने तिरुपूरच्या विभागीय महसूल अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. यात त्यांनी एका महिलेच्या मालमत्तेचा मुलाच्या नावाचा करार रद्द केला होता. न्यायमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले की, मुलांनी पालकांची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते सामान्य जीवन जगू शकतील. 

तक्रार हलक्यात घेऊ नका...nसरकारच्या सक्षम अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे, त्यांच्या जीवनाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणे अपेक्षित आहे, असे सांगून न्यायाधीश म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार अशा नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तांचे रक्षण करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. nन्यायालयाने म्हटले, ज्येष्ठ नागरिकाने दाखल केलेली तक्रार हलक्यात घेता येणार नाही. सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सर्व योग्य कारवाई सुरू करावी, असे न्यायाधीश म्हणाले. 

काय आहे प्रकरण? तिरुपूरचे रहिवासी मोहम्मद दायन यांनी ही याचिका दाखल केली होती. आरडीओने याचिकाकर्त्याची आई झाकिरा बेगम यांचा मालमत्तेचा करार रद्द केला होता. मोहम्मद सर्व भाऊ-बहिणींमध्ये मालमत्ता समान वाटून देईल आणि त्यांना देखभाल भत्ता देईल या विश्वासावर झाकिरा यांनी मालमत्ता दिली होती. मात्र मोहम्मदने शब्द न पाळल्याने झाकिराने करार रद्द केला. 

कोर्टाने काय म्हटले...जर मुलांनी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यात आणि त्यांची सेवा करण्यात निष्काळजीपणा दाखवला तर त्यांच्या नावावर असलेली संपत्ती परत घेता येईल. पालकांची इच्छा असेल तर ते त्यांचे मृत्यूपत्र बदलू शकतात.सेवा न देणाऱ्या मुलाला ते मालमत्तेतून बाहेर काढू शकतात. 

टॅग्स :Courtन्यायालयChennaiचेन्नईFamilyपरिवार