शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:07 IST

Court: आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

चेन्नई : आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.कोर्टाने तिरुपूरच्या विभागीय महसूल अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला. यात त्यांनी एका महिलेच्या मालमत्तेचा मुलाच्या नावाचा करार रद्द केला होता. न्यायमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले की, मुलांनी पालकांची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते सामान्य जीवन जगू शकतील. 

तक्रार हलक्यात घेऊ नका...nसरकारच्या सक्षम अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे, त्यांच्या जीवनाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणे अपेक्षित आहे, असे सांगून न्यायाधीश म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार अशा नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तांचे रक्षण करणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. nन्यायालयाने म्हटले, ज्येष्ठ नागरिकाने दाखल केलेली तक्रार हलक्यात घेता येणार नाही. सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी सर्व योग्य कारवाई सुरू करावी, असे न्यायाधीश म्हणाले. 

काय आहे प्रकरण? तिरुपूरचे रहिवासी मोहम्मद दायन यांनी ही याचिका दाखल केली होती. आरडीओने याचिकाकर्त्याची आई झाकिरा बेगम यांचा मालमत्तेचा करार रद्द केला होता. मोहम्मद सर्व भाऊ-बहिणींमध्ये मालमत्ता समान वाटून देईल आणि त्यांना देखभाल भत्ता देईल या विश्वासावर झाकिरा यांनी मालमत्ता दिली होती. मात्र मोहम्मदने शब्द न पाळल्याने झाकिराने करार रद्द केला. 

कोर्टाने काय म्हटले...जर मुलांनी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यात आणि त्यांची सेवा करण्यात निष्काळजीपणा दाखवला तर त्यांच्या नावावर असलेली संपत्ती परत घेता येईल. पालकांची इच्छा असेल तर ते त्यांचे मृत्यूपत्र बदलू शकतात.सेवा न देणाऱ्या मुलाला ते मालमत्तेतून बाहेर काढू शकतात. 

टॅग्स :Courtन्यायालयChennaiचेन्नईFamilyपरिवार