शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

पालकांच्या वैवाहिक कलहात सर्वाधिक कुचंबणा मुलांचीच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 6:24 AM

सुप्रीम कोर्टाचे मत : पालकांना सबुरीचा सल्ला; घटस्फोटाने वेगळे झालात तरी अपत्यांची जबाबदारी संपत नाही

नवी दिल्ली : घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये मुलांच्या ताब्यावरून दीर्घकाळ चालणाºया कोर्टकज्ज्यांचा वाईट परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. न्यायालय मुलाच्या हिताचा विचार करून योग्य वाटेल त्या पालकाकडे त्याचा ताबा देते खरे; पण तो आयुष्यात पुढे त्या मुलाच्या दृष्टीने किती योग्य ठरेल याचीही शाश्वती नसते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

दिल्लीतील एका दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा १० वर्षे प्रलंबित आहे व ते वेगळे राहतात. मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा यावरून त्यांचा वादही सुरू होता. या वादावर पडदा टाकताना न्या. अजय खानविलकर व न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने वरील उद्वेग व्यक्त केला. घटस्फोट घेऊन वेगळे झालात तरी अपत्यांच्या पालकत्वाची जबाबदारी संपत नाही. त्यामुळे भांडण आणि कोर्टकज्जे करताना मुलांचे आणि त्यांच्या भवितव्याचेही भान ठेवा. टोकाला न जाता संयम बाळगा, असा सल्लाही न्यायालयाने काडीमोड घेणाºया सर्वच दाम्पत्यांना उद्देशून दिला. न्यायालयाने असेही म्हटले की, लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी एकत्र कुटुंब पद्धती खरी तर आदर्श असते. आजी-आजोबा आणि नातवंडांचे एकत्र राहणे परस्परांच्या फायद्याचे व पूरक असते; पण सर्वाच्याच नशिबात असे आदर्श आयुष्य, म्हातारपण, बालपण असते असे नाही. विभक्त कुटुंब पद्धतीत राहणाºया दाम्पत्याच्या सहजीवनात जेव्हा बिव्बा पडतो व मजल घटस्फोटापर्यंत जाते, तेव्हा अजाण मुलांची जास्तच ओढाताण होते.पालकांचे सहचर्य आवश्यकमुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांना दोन्ही पालकांचे साहचर्य आवश्यक असते. घटस्फोटासोबत जेव्हा मुलांच्या ताब्याचा प्रश्न येतो तेव्हा मुलांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे प्रस्थापित न्यायतत्त्व आहे. त्यानुसार समोर आलेल्या तथ्यांचा विचार करून न्यायालय आपल्या विवेकानुसार दोनपैकी एका पालकाकडे मुलाचा ताबा देते; पण न्यायसंमत ताटातुटीने मुलांचे भावनिक विश्व मात्र पार उद््ध्वस्त होते.-न्या. खानविलकर व न्या. रस्तोगी, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयmarriageलग्न