शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हृदयद्रावक! मूल नसल्याने काका-काकूंनी घेतलेलं दत्तक; चेंगराचेंगरीत झाला मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:16 IST

नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता.

दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. अपघातात जीव गमावलेल्यांपैकी बरेच जण बिहारचे आहेत. या चेंगराचेंगरीत वैशाली जिल्ह्यातील एका १२ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर येथील नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. तिथे गर्दीत गुदमरल्याने आणि स्टेशनवर चेंगराचेंगरीमुळे त्याचाही मृत्यू झाला. पाटेपूर दाभाईच येथील संजीत पासवान आणि कमलेश यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान नीरजला त्याच्या काका आणि काकूंनी त्यांना मुल नव्हतं म्हणून दत्तक घेतलं आणि त्यांच्यासोबत दिल्लीला आणलं.

नीरजचं दिल्लीतील एका शाळेत ही त्याचं एडमिशन घेण्यात आलं होतं. तो अभ्यासातही हुशार होता. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं  आणि अवघ्या ३ महिन्यांनंतर दिल्लीहून घरी परतत असताना नीरजचा या घटनेत मृत्यू झाला.

अपघात आणि स्टेशनवरील चेंगराचेंगरीमुळे गर्दीत अडकलेले काका-काकूही जखमी झाले. नीरजच्या मृत्यूची बातमी समजताच  कुटुंबीय आणि गावामध्ये शोककळा पसरली आहे. नीरजचे वडील संजीत पासवान यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे आणि यामागे गैरव्यवस्थापन हे कारण असल्याचं म्हटलं आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर यांनी सांगितलं की, घटनेच्या वेळी पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म १५ वर उभी होती. यावेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी होती आणि अनेक प्रवासी पडले. ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची चौकशी उच्चस्तरीय समितीकडून केली जात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीrailwayरेल्वेBiharबिहार