शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हृदयद्रावक! मूल नसल्याने काका-काकूंनी घेतलेलं दत्तक; चेंगराचेंगरीत झाला मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:16 IST

नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता.

दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. अपघातात जीव गमावलेल्यांपैकी बरेच जण बिहारचे आहेत. या चेंगराचेंगरीत वैशाली जिल्ह्यातील एका १२ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर येथील नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. तिथे गर्दीत गुदमरल्याने आणि स्टेशनवर चेंगराचेंगरीमुळे त्याचाही मृत्यू झाला. पाटेपूर दाभाईच येथील संजीत पासवान आणि कमलेश यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान नीरजला त्याच्या काका आणि काकूंनी त्यांना मुल नव्हतं म्हणून दत्तक घेतलं आणि त्यांच्यासोबत दिल्लीला आणलं.

नीरजचं दिल्लीतील एका शाळेत ही त्याचं एडमिशन घेण्यात आलं होतं. तो अभ्यासातही हुशार होता. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं  आणि अवघ्या ३ महिन्यांनंतर दिल्लीहून घरी परतत असताना नीरजचा या घटनेत मृत्यू झाला.

अपघात आणि स्टेशनवरील चेंगराचेंगरीमुळे गर्दीत अडकलेले काका-काकूही जखमी झाले. नीरजच्या मृत्यूची बातमी समजताच  कुटुंबीय आणि गावामध्ये शोककळा पसरली आहे. नीरजचे वडील संजीत पासवान यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे आणि यामागे गैरव्यवस्थापन हे कारण असल्याचं म्हटलं आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर यांनी सांगितलं की, घटनेच्या वेळी पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म १५ वर उभी होती. यावेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी होती आणि अनेक प्रवासी पडले. ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची चौकशी उच्चस्तरीय समितीकडून केली जात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीrailwayरेल्वेBiharबिहार