शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

हृदयद्रावक! मूल नसल्याने काका-काकूंनी घेतलेलं दत्तक; चेंगराचेंगरीत झाला मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:16 IST

नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता.

दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. अपघातात जीव गमावलेल्यांपैकी बरेच जण बिहारचे आहेत. या चेंगराचेंगरीत वैशाली जिल्ह्यातील एका १२ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील पाटेपूर येथील नीरज काल रात्री त्याच्या काका-काकूंसोबत दिल्लीहून घरी म्हणजेच बिहारला परतण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. तिथे गर्दीत गुदमरल्याने आणि स्टेशनवर चेंगराचेंगरीमुळे त्याचाही मृत्यू झाला. पाटेपूर दाभाईच येथील संजीत पासवान आणि कमलेश यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान नीरजला त्याच्या काका आणि काकूंनी त्यांना मुल नव्हतं म्हणून दत्तक घेतलं आणि त्यांच्यासोबत दिल्लीला आणलं.

नीरजचं दिल्लीतील एका शाळेत ही त्याचं एडमिशन घेण्यात आलं होतं. तो अभ्यासातही हुशार होता. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं  आणि अवघ्या ३ महिन्यांनंतर दिल्लीहून घरी परतत असताना नीरजचा या घटनेत मृत्यू झाला.

अपघात आणि स्टेशनवरील चेंगराचेंगरीमुळे गर्दीत अडकलेले काका-काकूही जखमी झाले. नीरजच्या मृत्यूची बातमी समजताच  कुटुंबीय आणि गावामध्ये शोककळा पसरली आहे. नीरजचे वडील संजीत पासवान यांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे आणि यामागे गैरव्यवस्थापन हे कारण असल्याचं म्हटलं आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर यांनी सांगितलं की, घटनेच्या वेळी पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म १४ वर उभी होती आणि जम्मूकडे जाणारी संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म १५ वर उभी होती. यावेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी होती आणि अनेक प्रवासी पडले. ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची चौकशी उच्चस्तरीय समितीकडून केली जात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीrailwayरेल्वेBiharबिहार