शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

प्रशांत किशोर यांना जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 12:42 IST

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची जनसुरज पदयात्रा बिहारमध्ये सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या यात्रेदरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला होता.

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जनसुरज पदयात्रा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी या यात्रेदरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला होता. 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मला आपला उत्तराधिकारी बनण्याची ऑफर दिली होती, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. या दाव्याला आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

"प्रशांत किशोर भाजप पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. जेडीयू काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याचेही ते म्हणाले.तसेच प्रशांत किशोर यांनी उत्तरादिकारीवरुन केलेल्या दावाही नितीश कुमार फेटळून लावला आहे. 

"प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत आहेत. जेडीयूचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा सल्लाही मला प्रशांत किशोर यांनी दिला होता. उत्तराधिकारी बनवायच्या दाव्यावर बोलताना नितीश कुमार म्हणाले, "प्रशांत किशोर काहीही बोलत राहतात, ते भाजपला मदत करत आहेत. प्रशांत किशोर यांना मी फोन केला नव्हता, ते स्वतः आले होते. मी त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही.", असंही नितीश कुमार म्हणाले.  

Bihar Politics: जेडीयू-आरजेडीमध्ये तणाव! महाआघाडीत सहभागी झालेले हे छोटे पक्ष करतायत मोठी मागणी 

प्रशांत किशोर यांची बिहारमध्ये जन सुरज यात्रा सुरू आहे. या यात्रेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. ''मला नितीश कुमार यांनी उत्तराधिकारी बनण्याची ऑफर दिली होती असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. पण  मी कोणाला ओळखत नसल्याने मी नकार दिला.बिहारच्या जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले पाहिजे, असंही ते म्हणाले. 

जेडीयू-आरजेडीमध्ये तणाव!

बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीत सहभागी असलेले छोटे पक्ष आता एका समन्वय समितीची मागणी करताना दिसत आहेत. यासंदर्भात चर्चाही सुरू झाली आहे. नुकतेच तत्कालीन कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा राजीनामा, त्यांचे वडील तथा आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आणि जेडीयूतील नाराजीनंतर अशा प्रकारची समिती असावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

खरे तर, आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नुकतेच, 2023 पर्यंत तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, अशा आशचे  वक्तव्य केले होते. यामुळे जेडीयूचे अनेक नेते नाराज झाले. सत्ताधारी महाआघाढीतील जेडीयू आणि आरजेडी या दोन सर्वात मोठ्या घटक पक्षांत तणाव निर्माण झाल्याने सरकारमध्ये सहभागी असलेल्या छोट्या पक्षांनी सरकारचे कामकाज सुरळितपणे चालावे यासाठी एक समन्वय समिती लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेस