शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'पंजाब- दिल्लीमध्ये Z+ सुरक्षेची गरज नाही', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संरक्षण घेण्यास दिला नकार, पोलिसांवर ठेवला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:03 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्राकडून मिळणारी Z+ सिक्युरीटी नाकारली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्राकडून मिळणारी Z+ सिक्युरीटी नाकारली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात, मुख्यमंत्र्यांनी पंजाब आणि दिल्लीसाठी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे, त्यांना या दोन्ही ठिकाणी पंजाब पोलिसांकडून विशेष संरक्षण आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी केंद्र सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस सुरक्षा मंजूर करून संपूर्ण सुरक्षा कवच देण्याची निर्देश दिले होते. 

केंद्राने सीआरपीएफला पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना तत्काळ प्रभावाने अखिल भारतीय आधारावर 'Z+' सुरक्षा कवच प्रदान करण्याचे निर्देश दिले होते. पंजाब पोलिसांच्या सुरक्षेव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचे घर आणि जवळच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झेड सुरक्षा कवच मंजूर करण्यात आले होते. सीमावर्ती राज्यातील खलिस्तानी कारवाया लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांना धोक्याच्या जाणिवेचा अहवाल तयार करताना केंद्रीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी मान यांच्यासाठी अशा सुरक्षा कवचाची शिफारस केली होती. यासाठी सीआरपीएफकडून ५५ सशस्त्र जवानांची टीम सीएम मान यांच्या घरी पाठवण्यात येणार होती.

मार्च महिन्यामध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मुलीला खलिस्तान समर्थक घटकांकडून धमकीचे फोन आले होते. पटियालास्थित एका वकिलाने दावा केला होता की, मान यांची मुलगी सीरत कौर मान, जी अमेरिकेत राहते, तिला खलिस्तान समर्थक घटकांनी कथितपणे बोलावले आणि गैरवर्तन केले. पंजाबमधील स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक आणि वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई करताना ही घटना समोर आली आहे. नंतर मोगा येथे आत्मसमर्पण करणाऱ्या अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी राज्य पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली.

Smriti Irani : "हे दिव्य राजकीय प्राणी..."; काँग्रेसच्या 'Missing' ट्विटला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सुरक्षा पथकाने गुरुवारी केंद्र सरकारला पत्र लिहून पंजाब आणि दिल्लीत Z+ सुरक्षेची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्यासाठी फक्त पंजाबची विशेष टीम आणि मुख्यमंत्र्यांची सुरक्षा पुरेशी आहे. या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना पत्रात लिहिले आहे की, पंजाब आणि दिल्लीत दोन सुरक्षा मंडळे असल्याने समस्या उद्भवू शकतात. २५ मे रोजीच केंद्र सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपPoliceपोलिसBhagwant Mannभगवंत मान