शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 15:51 IST

काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे.

ठळक मुद्देराज्यात कलम ३७० लागू करण्याची आणि राज्यातील पूर्वस्थिती पुन्हा लागू करण्याची काश्मिरी पक्षांची मागणी काश्मिरी पक्षांच्या या मागणीस पी चिदंबरम यांनी दिला पाठिंबा जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णय गतवर्षी झाला होता

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीरचे द्विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आता एक वर्ष उलटून गेले आहे. दरम्यान, आता वर्षभरानंतर कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, काश्मिरी पक्षांच्या या जाहीरनाम्यास काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे.काश्मिरी पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक संयुक्त निवेदन दिले असून, त्या माध्यमातून राज्यात कलम ३७० लागू करण्याची आणि राज्यातील पूर्वस्थिती पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पक्षांच्या या मागणीस पी चिदंबरम यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या सहा काश्मिरी पक्षांना सॅल्युट ठोकला आहे.चिदंबरम यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून त्यात ते म्हणतात की, कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकजूट झाले्ल्या मुख्य प्रवाहातील पक्षांमधील ऐक्य आणि हिंमतीला माझा सलाम. आता तुम्ही या मागणीसाठी ठाम राहा. स्वयंभू राष्ट्रवाद्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. जे इतिहास वाचत नाहीत. तर इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विचार करू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे.

देशाच्या घटनेमध्ये राज्यांसाठी काही विशेष तरतुदींचे अनेक उल्लेख आहेत. जर सरकार या विशेष उल्लेखांना विरोध करत असेल तर तर नागांच्या प्रश्नासारखे प्रश्न कसे सोडवता येतील, असा सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला.काश्मिरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू व्हावे यासाठी पक्षांनी आपला जाहीरनामा तयार केला आहे. त्यामध्ये नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, जेकेपीसीसीचे जीए मीर, माकपचे एमवाय तारिगामी, जेकेपीसीचे सज्जाद गनी लोन, जेकेएएनसीचे मुझफ्फर शाह यांच्या नावांचा समावेश आहे.५ ऑगस्ट् २०१९ रोजी झालेल्या घटनेने केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील नाते पूर्णपणे बदलून गेले आहे. जम्मू काश्माीरमधील शांतताप्रिय लोकांसाठी हा कसोटीचा काळ आहे. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण घटनेनुसार जम्मू काश्मीरला विशेर राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी सामूहिकरीत्या लढण्यासाठीच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370PoliticsराजकारणP. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेस