शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Rahul Gandhi : "पेन काढा आणि लिहा, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल"; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 17:47 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने 2018 मध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अंबिकापूरच्या सरगुजा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. या बैठकीत त्यांनी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देतानाच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने 2018 मध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना, पेन काढा आणि लिहा, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. 2018 मध्ये आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसगडशी माझं जुनं नातं आहे असं म्हटलं. 

"मी तुम्हाला दोन-तीन आश्वासने दिली होती. आमचं सरकार आल्यावर दोन-तीन कामं नक्कीच होतील, असं आम्ही म्हटलं होतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सर्वात मोठं काम होतं, ही काही छोटी गोष्ट नव्हती. त्यावेळी भाजपाच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्ष खरं बोलत नसल्याचं म्हटलं होतं" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. ते सरगुजामध्ये म्हणाले, "मोदीजींना जातनिहाय जनगणना करायची नाही. ते म्हणतात गरीब ही फक्त एक जात असते. मोदीजींच्या मते ओबीसी ही जात नाही. देश चालवण्यात मागासवर्गीयांचा सहभाग नाही. नरेंद्र मोदींकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी आहे पण त्यांना ती दाखवायची नाही." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा