शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कार कोसळली खोल खड्ड्यात, तीन जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:41 IST

छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात एक भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. 

ठळक मुद्देभीषण रस्ते अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, एक जण जखमीसर्वजण दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय, कारमध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या

रायपूर - छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात एक भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे.  रायपूर जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिर हसौद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अटल नगर परिसरात एक भरधाव कार रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.या घटनेत झारखंडमधील रवि कुमार तिवारी (22 वर्ष), कोलकात्यातील ओमेर आलम (25 वर्ष) आणि रायपूरमधील मनाल कोसरिया (24 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला.  तर कोलकात्यातीलच रहिवासी असलेला सौरभ साह (22 वर्ष) हा गंभीर जखमी झाली आहे.

अधिकाऱ्यांनी असंही सांगितले की, मृत पावलेले सर्वजण अटल नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. मंगळवारी (29 जानेवारी) रात्रीच्या सुमारास हे चारही जण मंदिर हसौद परिसराच्या दिशेनं गेले. अटल नगर परिसरात आल्यानंतर त्यांची कार रस्त्याशेजारी असणाऱ्या खोल खड्ड्यात जाऊन पडली. 

(मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी)

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी तीन मृतदेह आणि जखमीला हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान, हे चारही जण दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू