शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

ईडब्ल्यूएस आरक्षणाची  वैधता तपासणार, सुप्रीम काेर्टाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 09:21 IST

EWS Reservation: मुस्लिमांना आरक्षण देणारा स्थानिक कायदा रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वी आपण आर्थिकद्दृष्ट्या मागास वर्गातील लोकांना शिक्षण व नोकऱ्यांत दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घटनात्मक वैधता तपासू

नवी दिल्ली : मुस्लिमांना आरक्षण देणारा स्थानिक कायदा रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वी आपण आर्थिकद्दृष्ट्या मागास वर्गातील लोकांना शिक्षण व नोकऱ्यांत दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घटनात्मक वैधता तपासू, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. 

आम्ही प्रक्रियात्मक पैलू आणि अन्य तपशिलावर ६ सप्टेंबर रोजी निर्णय घेऊ आणि १३ सप्टेंबरपासून याचिकांवर सुनावणी करू, असे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत, न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने म्हटले. 

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठाने चार वेगवेगळी मते व्यक्त करणाऱ्या निकालाद्वारे स्टेट टू मुस्लीम कम्युनिटी ॲक्ट २००५ अंतर्गत मुस्लिमांना आरक्षण देण्याची तरतूद घटनाबाह्य घोषित केली होती. आंध्र उच्च न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध राज्य सरकारच्या अपिलासह १९ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत.  (वृत्तसंस्था)

निकालाला आव्हान : नंतर सुनावणीकेंद्राने १०३ व्या घटनादुरुस्ती कायदा २०१९ द्वारे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) शिक्षण, व नोकऱ्यांत आरक्षणाची तरतूद केली होती. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने मुस्लिमांना आरक्षण देणारा स्थानिक कायदा रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करेल. घटनात्मक पीठाने शादान फरासत, नचिकेत जोशी, महफूज नजकी आणि कनू अग्रवाल यांना नोडल वकील म्हणून काम करण्यास सांगितले आहे. 

गुजरात दंगलीशी संबंधित ११ याचिका बंद२००२ च्या गुजरात दंगलीतील प्रकरणांच्या स्वतंत्र चौकशीसाठी जवळपास २० वर्षांपूर्वी दाखल ११ याचिकांवर सुनावणीला अर्थ नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी त्या बंद केल्या. या याचिकांत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्याही एका याचिकेचा समावेश होता.  

‘निर्णयासाठी काहीही उरलेले नाही’मानवाधिकार आयोगासह कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या सिटीझन्स फॉर जस्टीस अँड पीस सारख्या संघटनांनी तेव्हा दंगलीची कोर्टाच्या निगराणीखाली चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाचे वकील मुकुल रोहतगी आणि सीजेपीच्या अपर्णा भट्ट यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादांवर विचार केला व त्यानंतर आता या याचिकांमध्ये निर्णयासाठी काहीही उरलेले नाही, असे कोर्टाने सांगितले.

न्यायालयाने म्हटले की, कोर्टाला यापुढे या याचिकांवर विचाराची गरज नाही. याचिका निकाली काढण्यात येत आहेत, असा निकाल पीठाने दिला. एसआयटीने गुजरात दंगलीतील ज्या नऊ प्रकरणांची चौकशी केली होती, त्यातील नरोडा गाव प्रकरणाची सुनावणी कनिष्ठ न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे तर अन्य प्रकरणांत कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिलेले आहेत आणि ते आता अपील स्तरावर गुजरात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, असा युक्तिवाद एसआयटीने केला होता. त्याची पीठाने नोंद घेतली.

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय