शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

'भारतीय विमान कंपन्यांवरील कररचनेत बदल करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 4:22 AM

एमआरओ असोसिएशन ऑफ इंडिया; उद्योगाला पायाभूत क्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी

मुंबई : देशातील हवाई वाहतूक क्षेत्राची सातत्याने वाढ होत असल्याने विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे विमान देखभाल, दुरुस्ती आणि तपासणी (एमआरओ) क्षेत्राच्या कामात वाढ होत आहे.मात्र, देशातील एमआरओ सेवांसाठी १८ टक्के जीएसटी व परदेशी एमआरओ सेवांसाठी अवघा ५ टक्के जीएसटी हा मूलभूत फरक असल्याने देशात विमान दुरुस्ती व देखभाल करण्याऐवजी या सेवा परदेशी एमआरओकडून घेतल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारने भारतीय एमआरओ व विदेशी एमआरओंना समकक्ष करून दोघांकडून समान जीएसटी आकारावा, अशी आग्रही मागणी एमआरओ असोसिएशन आॅफ इंडियाने केली आहे.एमआरओमधील व्यवसाय संधी वाढविण्यासाठी या उद्योगाला पायाभूत क्षेत्राचा दर्जा द्यावा, भारतीय एमआरओ उद्योगाचा सध्याचा जीएसटी १८ टक्क्यांवरून घटवून ५ टक्के करावा, आयात सेवांसाठी १८ टक्के जीएसटी आकारावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी केली आहे.सध्या भारतीय व विदेशी एमआरओ सेवांमध्ये सरकार दुजाभाव करीत असल्याने भारतीय एमआरओंना अधिक खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. भारतीय एमआरओ उद्योगाला सक्षमपणे उभे करून प्रगती करण्यासाठी भारतीय व विदेशी एमआरओ उद्योगांना समान कररचना लागू करण्याची गरज आहे. देशातील हवाई क्षेत्र विस्तारत असताना या उद्योगाची मात्र घट होत आहे.एमआरओला लागणाऱ्या गरजांची पूर्तता ९० टक्के आयातीच्या माध्यमातून केली जात असल्याने या क्षेत्रातील ९० हजार रोजगार श्रीलंका, सिंगापूर, थायलंड, फ्रान्स, जर्मनीकडे गेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणी धोरण ठरवून या उद्योगाला समान संधी द्यावी, याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.भारतीय एमआरओ क्षेत्रात आवश्यक क्षमता आहे. मात्र, असमान संधीमुळे त्यांना झगडावे लागत आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात एमआरओ क्षेत्रात ३१ हजार ५०० कोटी खर्च करण्यात आला आहे. एअर फ्रेम एमआरओचा हिस्सा २७ टक्के म्हणजे ९ हजार ४५० कोटी रुपये आहे. सरकारसाठी होणारी ही महसुली तूट आहे. विमानांच्या इंजीनसाठी कम्पोनंट ओव्हरहॉल करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्याचा फटका देशाला बसत असल्याचा आरोप संघटनेचे उपाध्यक्ष रवी मेनन यांनी केला.२०१७-१८ मध्ये एमआरओच्या आयातीवर १.४ अब्ज डॉलर्स खर्च झाले असून २०२३ मध्ये हा खर्च ३ अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे. भारतात या उद्योगावर १८ टक्के कर आकारण्यात येत असताना सिंगापूर, मलेशिया येथे ७ टक्के आकारण्यात येतो तर श्रीलंकेत त्यावर कर आकारण्यात येत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील दुजाभाव त्वरित संपविण्यात यावा, अशी मागणी मलकानी यांनी केली आहे.