शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

'देशात बदल घडवण्याची सुरूवात झाली', पवारांनी सांगितलं सर्वपक्षीय बैठकीचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:50 IST

शरद पवार यांनी बैठकीनंतर बोलताना जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची आठवण सांगितली.

पाटना - आगामी काळात विरोधक एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची आणखी एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीला अंतिम रूप येईल. विरोधकांमध्ये मतभेद नाहीत. देशहितासाठी सगळे एकत्र येत आहेत. आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील आव्हानांना एकत्र सामोरे जाणार असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच, या बैठकीमुळे देशात बदल घडवण्याची सुरुवात पाटणातून झाल्याचंही ते म्हणाले. 

शरद पवार यांनी बैठकीनंतर बोलताना जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची आठवण सांगितली. जयप्रकाश यांनी एक संदेश दिला आणि देशात संपूर्ण वातावरण बदललं होतं, असे पवार यांनी म्हटलं. बिहारमधून अनेक आंदोलनांची सुरुवात झाली आणि ते जनतेनं स्विकारले. आज नितीश कुमार यांनी येथे बैठका बोलावली, त्यासाठी सर्वपक्षीय सहकारी एकत्र आले. या बैठकीत चर्चा झाली, त्यातून सर्वांनीच एकत्र येऊन काम करण्याचं निश्चित केलं आहे. एक नवीन रस्ता दाखवण्याचं काम इथून सुरू झालं आहे. मला विश्वास आहे की देशातील जनता याचं समर्थन करेल, असे शरद पवार यांनी म्हटले.

देशात आज दररोज एक नवीन समस्या पाहायला मिळत आहे. धार्मिक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजाच्या एकतेसाठी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा आपल्याला सामना करावा लागेल. हा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपापसांत काहीतरी मतभेद असू शकतात. मात्र, राष्ट्रहितासाठी आपल्यातील मतभेदांकडे दुर्लक्षित केलं पाहिजे. मला विश्वास आहे की, पाटना येथून झालेली ही सुरुवात, देशात बदल घडवण्याची सुरुवात ठरेल, असेही शरद पवार यांनी म्हटले.  

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे

या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्व नेते एकत्रित आले. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व विरोधक एकजूट झाले. पुढील निवडणुका कशा लढायच्या याबाबत कॉमन अजेंडा बनवण्यात येईल. त्यानंतर पुढील महिन्यात १० किंवा १२ जुलैला हिमाचल प्रदेशातील शिमला इथं पुन्हा विरोधकांची बैठक होईल. वेगवेगळ्या राज्यात आम्हाला समान कार्यक्रमाची भूमिका घ्यावी लागेल. सर्व रणनीती आखून निर्णय घेऊ. हीच एकजूट ठेऊन २०२४ ची निवडणूक लढायची आहे. भाजपाला सत्तेतून बाहेर काढायचा यात आम्हाला यश आले. आजची बैठक नितीश कुमार यांनी बोलावली, त्यांचे धन्यवाद देतो. भारत जोडो यात्रेतून आम्ही ज्याज्या ठिकाणी गेलो तिथले सगळे नेते आजच्या बैठकीला उपस्थित झालेत असं खरगेंनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNitish Kumarनितीश कुमारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा