शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

Chandrayaan-2 : भारताला पुढील मोहिमांसाठी चांद्रयान-2 चा उपयोग होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 09:38 IST

अत्यंत कठीण असलेली मोहीम हाती घेतल्याबद्दल लायनेंगर यांनी इस्रोचे कौतुक केले आहे. 

ठळक मुद्देअत्यंत कठीण असलेली मोहीम हाती घेतल्याबद्दल लायनेंगर यांनी इस्रोचे कौतुक केले आहे. आपण फार निराश होण्याची गरज नाही, खूप खूप अवघड कार्य पार पाडण्याचा भारताचा प्रयत्न होता. 'मी या मोहिमेकडे एक पूर्णत: यशस्वी मोहीम म्हणूनच पाहतो.'

नवी दिल्ली - चांद्रयान-2 च्या विक्रम मॉड्यूलचे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करण्याचा भारताचा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरी यातून मिळालेल्या धड्याचा उपयोग भारताला भविष्यातील  मोहिमांसाठी होईल असं प्रतिपादन अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाचे माजी अंतराळवीर जेरी लायनेंगर यांनी केले. 

जेरी लायनेंगर हे रशियाई अवकाश स्थानक 'मीर' वर पाच महिने होते. 1986 ते 2001 या कालावधीत पृथ्वीच्या निम्न कक्षेत मीर कार्यरत होते. चांद्रयान-2 च्या चंद्रभूमीवरील अवतरणाचे नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने लाईव्ह प्रक्षेपण केले. त्याताल चर्चेत जेरी लायनेंगर सहभागी झाले होते. लायनेंगर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आपण फार निराश होण्याची गरज नाही, खूप खूप अवघड कार्य पार पाडण्याचा भारताचा प्रयत्न होता. 

लँडर खाली येत असताना सर्व काही नियोजनाप्रमाणे होतही होते. दुर्दैवाने चांद्रभूमीपासून 400 मीटर अंतरावरील हॉवर पॉईंट वर पोहचण्यापूर्वीच त्याचा संपर्क तुटला. त्या बिंदूवर लँडर पोहोचले असते, तरी ती बाब उपयुक्त ठरली असती. रडार आणि लेसरची तपासणी ही त्यामुळे करता आली असती. जेरी लायनेंगर पुढे म्हणाले की, तुम्ही मागे वळून या संपूर्ण मोहिमेकडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, ही मोहीम भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ऑर्बिटर अत्यंत मौल्यवान माहिती पृथ्वीवर पाठवत राहणार आहे. ऑर्बिटरवरील सर्व यंत्रणा सुस्थितीत आहेत. या मोहिमेतून जे धडे मिळाले आहेत. त्याकडे पाहून मी या मोहिमेकडे एक पूर्णत: यशस्वी मोहीम म्हणूनच पाहतो. अत्यंत कठीण असलेली मोहीम हाती घेतल्याबद्दल लायनेंगर यांनी इस्रोचे कौतुक केले आहे. 

इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारतासमोर होती. मात्र या यशानं इस्रोला थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र यानंतरही इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम 95 टक्के यशस्वी झाली आहे. 

इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क मध्यरात्री तुटला. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विक्रमच्या लँडिंगआधीच भारताला बरंच मोठं यश मिळालं. चंद्राच्या कक्षेत असलेलं इस्त्रोचं ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असल्यानं चांद्रयान-2 मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचं मत इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन यांनी व्यक्त केलं. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असेपर्यंत लँडर विक्रम संपर्कात होतं. मात्र त्यानंतर विक्रम आणि इस्त्रोचा संपर्क तुटला.  

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2NASAनासाisroइस्रोIndiaभारत