शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चंद्राबाबूंनी ज्याला म्हटले EVM एक्सपर्टस् तो निघाला EVM चोर   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 5:18 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

नवी दिल्ली -  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. एका ईव्हीएम एक्सपर्ट्सच्या हवाल्याने चंद्राबाबू नायडूंनी हा दावा केला होता. मात्र निवडणूक आयोगाने जेव्हा त्या एक्सपर्ट्सला या दाव्याबाबत अधिक माहिती आणण्यास सांगितले तेव्हा हा एक्सपर्ट्स दुसरातिसरा कुणी नाही तर  हैदराबाद येथील रहिवासी हरिप्रसाद असल्याचे समोर आले. तसेच 2010 मध्ये ईव्हीएम चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.  चंद्राबाबू नायडू  यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर संध्याकाळी हरिप्रसाद याने  निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हरिप्रसाद याचा इतिहास शोधून काढला. त्यावेळी इव्हीएममध्ये छेडछाड करता येऊ शकते असा दावा अनेक वर्षांपासून करणारी व्यक्ती हरिप्रसादच असल्याचे समोर आले. तसेच याच हरिप्रदासने आपला दावा सिद्ध करण्यासाठी परदेशी तज्ज्ञाच्या मदतीने ईव्हीएम मशीन चोरली होती.  हरिप्रदास हा टीडीपीच्या लीगल सेलसोबत निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांना भेटण्यासाठी आला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रेकॉर्ड समोर ठेवले. त्यानंतर हरिप्रसाद आणि त्याच्यासोबत आलेली मंडळी तिथून निघून गेली. त्यानंतर निवडणूक आयोगाने टीडीपीच्या लीगल सेलला कठोर शब्दात पत्र लिहून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला प्रतिनिधीमंडळात तज्ज्ञ म्हणून जागा कशी मिळाली अशी विचारणा केली.  दरम्यान, हरिप्रसाद याला 2010 साली ईव्हीएम चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. तो 2009पासूनच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र 2009 मध्ये आयोजित हॅकेथॉनमध्ये त्याला ईव्हीएम हॅक करता आले नव्हते.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAndhra Pradesh Assembly Election 2019आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक 2019