शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन पे चर्चा ! मोदी सरकारची साथ सोडण्याबाबत घेतला मोठा निर्णय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 10:02 IST

लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. रालोआमधील भाजपाचे दोन मोठे सहकारी असलेले तेलगू देसम पक्ष आणि शिवसेना मोदी सरकारवर नाराज आहेत. या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली असून, या चर्चेमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी घसघशीत तरतूद करण्यात न आल्याने आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत चंद्राबाबू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्ष रालोआचा सहकारी म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. तसेच चंद्राबाबू यांच्याप्रमाणेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही शिवसेनेमधील सूत्रांनी केला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर केला होता. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही, म्हणून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले होते. त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत भूमिका मांडली होती. तर दुसरीकडे शिवसेना दीर्घकाळापासून भाजपावर नाराज आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपाचे दोन मोठे सहकारी रालोआची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.   

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा