शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन पे चर्चा ! मोदी सरकारची साथ सोडण्याबाबत घेतला मोठा निर्णय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 10:02 IST

लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. रालोआमधील भाजपाचे दोन मोठे सहकारी असलेले तेलगू देसम पक्ष आणि शिवसेना मोदी सरकारवर नाराज आहेत. या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली असून, या चर्चेमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी घसघशीत तरतूद करण्यात न आल्याने आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत चंद्राबाबू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्ष रालोआचा सहकारी म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. तसेच चंद्राबाबू यांच्याप्रमाणेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही शिवसेनेमधील सूत्रांनी केला आहे.  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर केला होता. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही, म्हणून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले होते. त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत भूमिका मांडली होती. तर दुसरीकडे शिवसेना दीर्घकाळापासून भाजपावर नाराज आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपाचे दोन मोठे सहकारी रालोआची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.   

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा