शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Farmers' Protest : शेतकरी बसले रेल्वे रुळावर, टिकरी सीमेवर 11 जवानांची प्रकृती खालावली, पंजाबच्या 3 जिल्ह्यात इंटरनेटवर बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 14:09 IST

Farmers' Protest : सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही.

Farmers' Protest : (Marathi News)चंदीगड : हरयाणातील शेतकरी (Farmers) आंदोलनामुळे पंजाबमधील (Punjab) तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. तसेच, पंजाबच्या बटिंडा आणि पटियालामध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत. सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही.

सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. हरयाणामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बीएसएफ जवानांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहेत. राज्यातील बहादूरगडमध्ये 11 जवान आजारी पडल्याची बातमी आहे. या जवानांना बहादुरगड येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचारी जेवण केल्यानंतर आजारी पडले आहेत. प्रत्येकजण लूज मोशनची तक्रार करत असून आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण 11 जवानांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर पाच जवानांना डिस्चार्ज देण्यात आला असून सहा जवानांवर अजूनही उपचार सुरू आहेत. 

बीएसएफ आणि आयटीबीपीचे हे जवान टिकरी सीमेपूर्वी सेक्टर 9 ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बीएसएफची तुकडी गर्ल्स कॉलेज, बहादूरगड येथे तैनात करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात संपूर्ण हरयाणा राज्यात एकूण 114 सुरक्षा कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांपैकी 64 पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या तर 50 कंपन्या हरयाणा पोलिसांच्या आहेत. हे जवान सलग तीन दिवस सीमेवर पहारा देत आहेत. दरम्यान, दिल्लीत प्रवेश टिकरी सीमेवरून होतो.

आंदोलनाचा आजचा तिसरा दिवसशेतकरी आंदोलनाचा गुरुवारी तिसरा दिवस आहे. हरयाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. कडक पोलीस बंदोबस्तामुळे गेल्या 72 तासांत शेतकरी सीमा ओलांडू शकलेले नाहीत. मात्र, याठिकाणीच शेतकरी दिवस-रात्र ठाण मांडून बसले आहेत. येथेच त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली जात आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये सरकार आणि शेतकरी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. सध्या या चर्चेनंतर शेतकरी पुढील रणनीती ठरवणार आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन