शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Farmers' Protest : शेतकरी बसले रेल्वे रुळावर, टिकरी सीमेवर 11 जवानांची प्रकृती खालावली, पंजाबच्या 3 जिल्ह्यात इंटरनेटवर बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 14:09 IST

Farmers' Protest : सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही.

Farmers' Protest : (Marathi News)चंदीगड : हरयाणातील शेतकरी (Farmers) आंदोलनामुळे पंजाबमधील (Punjab) तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत शंभू सीमा आणि खनौरी सीमेच्या आसपासच्या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. तसेच, पंजाबच्या बटिंडा आणि पटियालामध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत. सध्या शंभू सीमेवर शेतकरी शांत बसले आहेत. पोलिस आणि निमलष्करी दलाकडून फारशी कारवाई झालेली नाही.

सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. हरयाणामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बीएसएफ जवानांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहेत. राज्यातील बहादूरगडमध्ये 11 जवान आजारी पडल्याची बातमी आहे. या जवानांना बहादुरगड येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचारी जेवण केल्यानंतर आजारी पडले आहेत. प्रत्येकजण लूज मोशनची तक्रार करत असून आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण 11 जवानांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर पाच जवानांना डिस्चार्ज देण्यात आला असून सहा जवानांवर अजूनही उपचार सुरू आहेत. 

बीएसएफ आणि आयटीबीपीचे हे जवान टिकरी सीमेपूर्वी सेक्टर 9 ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बीएसएफची तुकडी गर्ल्स कॉलेज, बहादूरगड येथे तैनात करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात संपूर्ण हरयाणा राज्यात एकूण 114 सुरक्षा कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांपैकी 64 पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या तर 50 कंपन्या हरयाणा पोलिसांच्या आहेत. हे जवान सलग तीन दिवस सीमेवर पहारा देत आहेत. दरम्यान, दिल्लीत प्रवेश टिकरी सीमेवरून होतो.

आंदोलनाचा आजचा तिसरा दिवसशेतकरी आंदोलनाचा गुरुवारी तिसरा दिवस आहे. हरयाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. कडक पोलीस बंदोबस्तामुळे गेल्या 72 तासांत शेतकरी सीमा ओलांडू शकलेले नाहीत. मात्र, याठिकाणीच शेतकरी दिवस-रात्र ठाण मांडून बसले आहेत. येथेच त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय केली जात आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये सरकार आणि शेतकरी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. सध्या या चर्चेनंतर शेतकरी पुढील रणनीती ठरवणार आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन