शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

''आव्हाने व खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:20 IST

न्यायदानाच्या कार्यात येणारी आव्हाने व आयुष्यातील खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते,

नवी दिल्ली : न्यायदानाच्या कार्यात येणारी आव्हाने व आयुष्यातील खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते, असे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई आपल्या निरोपप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले. गोगोई यांनी शुक्रवारी देशभरातल्या उच्च न्यायालयांतील ६५० न्यायाधीश व १५ हजार न्यायदंडाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून एक नवा पायंडा पाडला व त्यांचा निरोप घेतला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) शुक्रवारी आयोजित केलेला निरोप समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी कोणाचेही भाषणे झाले नाही.या कार्यक्रमाला भावी सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित होते. निरोप समारंभात कोणीही भाषण करू नये, अशी गोगोई यांची इच्छा असल्याचे एससीबीएच्या सचिव प्रीती सिंग यांनी सांगितले. एससीबीएचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी या समारंभाला उपस्थित असलेल्यांचे स्वागत केले. गोगोई हे सर्वोत्कृष्ट सरन्यायाधीशांपैकी एक आहेत, असे खन्ना यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त होत असले तरी आठवडाअखेर आलेल्या सुट्यांमुळे त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. त्यानुसार परंपरेचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयातील दालन क्रमांक एकमध्ये गोगोई भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमवेत बसले. ते तिथे केवळ चार मिनिटे होते. या कालावधीत गोगोई व बोबडे यांच्या खंडपीठाने १० खटल्यांमध्ये नोटिसा जारी केल्या. दुपारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.>ऐतिहासिक महत्त्वाचे निकालसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या काही दिवसांत काही ऐतिहासिक निकाल दिले. गेली अनेक दशके प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमीच्या वादावर गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेला निकाल खूपच महत्त्वाचा होता.कर्नाटकमधील आमदारांना अपात्र ठरविण्याचे प्रकरण, शबरीमलातील आय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा मुद्दा, राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालावरील फेरविचार याचिका, राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप असलेला खटला, अशा प्रकरणांचे त्यांनी निकाल दिले. शबरीमलाचा खटला त्यांनी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय