शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

''आव्हाने व खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:20 IST

न्यायदानाच्या कार्यात येणारी आव्हाने व आयुष्यातील खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते,

नवी दिल्ली : न्यायदानाच्या कार्यात येणारी आव्हाने व आयुष्यातील खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते, असे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई आपल्या निरोपप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले. गोगोई यांनी शुक्रवारी देशभरातल्या उच्च न्यायालयांतील ६५० न्यायाधीश व १५ हजार न्यायदंडाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून एक नवा पायंडा पाडला व त्यांचा निरोप घेतला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) शुक्रवारी आयोजित केलेला निरोप समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी कोणाचेही भाषणे झाले नाही.या कार्यक्रमाला भावी सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित होते. निरोप समारंभात कोणीही भाषण करू नये, अशी गोगोई यांची इच्छा असल्याचे एससीबीएच्या सचिव प्रीती सिंग यांनी सांगितले. एससीबीएचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी या समारंभाला उपस्थित असलेल्यांचे स्वागत केले. गोगोई हे सर्वोत्कृष्ट सरन्यायाधीशांपैकी एक आहेत, असे खन्ना यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी सेवानिवृत्त होत असले तरी आठवडाअखेर आलेल्या सुट्यांमुळे त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. त्यानुसार परंपरेचा भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयातील दालन क्रमांक एकमध्ये गोगोई भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमवेत बसले. ते तिथे केवळ चार मिनिटे होते. या कालावधीत गोगोई व बोबडे यांच्या खंडपीठाने १० खटल्यांमध्ये नोटिसा जारी केल्या. दुपारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.>ऐतिहासिक महत्त्वाचे निकालसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या काही दिवसांत काही ऐतिहासिक निकाल दिले. गेली अनेक दशके प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमीच्या वादावर गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेला निकाल खूपच महत्त्वाचा होता.कर्नाटकमधील आमदारांना अपात्र ठरविण्याचे प्रकरण, शबरीमलातील आय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा मुद्दा, राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालावरील फेरविचार याचिका, राहुल गांधी यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप असलेला खटला, अशा प्रकरणांचे त्यांनी निकाल दिले. शबरीमलाचा खटला त्यांनी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय