शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘ते’ एकत्र आल्यास भाजपला आव्हान! हे समीकरण जमले, तरच PM नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 08:32 IST

हे समीकरण जमले, तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य आहे, असे मत  राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा विश्वास निर्माण करायचा असेल, तर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या तिन्ही चेहऱ्यांना विरोधकांचे नेतृत्व करावे लागेल. हे समीकरण जमले, तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य आहे, असे मत  राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपच्या बलाढ्य निवडणूक यंत्रणेला धूळ चारून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नोंदविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर विरोधी पक्षांमध्ये उत्साह आहे,  शनिवारी कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावणाऱ्या विरोधी नेत्यांच्या यादीवरून स्पष्ट होणार आहे. 

जिथे सोनिया गांधींचा प्रभाव अपुरा ठरतो, तिथे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार आणि नितीशकुमार यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सोनिया गांधींबरोबर पवार आणि नितीशकुमार यांनाही सन्मानाचे पद दिले, तरच विरोधक एकजूट झाल्याचा गंभीर संदेश जनतेत जाऊ शकेल. 

पवार-नितीशकुमार का महत्त्वाचे?शरद पवार आणि नितीशकुमार यांच्यात काँग्रेसच्या आवाक्याबाहेर असलेल्या यूपीएबाहेरच्या पक्षांना आकृष्ट करण्याची क्षमता आहे. विरोधी ऐक्य साधण्यासाठी काँग्रेसला प्रसंगी पंतप्रधानपदावरील दावा सोडून आणि राजकीय महत्त्वाकांक्षांना आवर घालून विरोधकांशी समझोता करावा लागणार आहे. त्यासाठी शरद पवार आणि नितीशकुमार यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण