शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ एकत्र आल्यास भाजपला आव्हान! हे समीकरण जमले, तरच PM नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 08:32 IST

हे समीकरण जमले, तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य आहे, असे मत  राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा विश्वास निर्माण करायचा असेल, तर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या तिन्ही चेहऱ्यांना विरोधकांचे नेतृत्व करावे लागेल. हे समीकरण जमले, तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य आहे, असे मत  राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपच्या बलाढ्य निवडणूक यंत्रणेला धूळ चारून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नोंदविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर विरोधी पक्षांमध्ये उत्साह आहे,  शनिवारी कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावणाऱ्या विरोधी नेत्यांच्या यादीवरून स्पष्ट होणार आहे. 

जिथे सोनिया गांधींचा प्रभाव अपुरा ठरतो, तिथे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार आणि नितीशकुमार यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सोनिया गांधींबरोबर पवार आणि नितीशकुमार यांनाही सन्मानाचे पद दिले, तरच विरोधक एकजूट झाल्याचा गंभीर संदेश जनतेत जाऊ शकेल. 

पवार-नितीशकुमार का महत्त्वाचे?शरद पवार आणि नितीशकुमार यांच्यात काँग्रेसच्या आवाक्याबाहेर असलेल्या यूपीएबाहेरच्या पक्षांना आकृष्ट करण्याची क्षमता आहे. विरोधी ऐक्य साधण्यासाठी काँग्रेसला प्रसंगी पंतप्रधानपदावरील दावा सोडून आणि राजकीय महत्त्वाकांक्षांना आवर घालून विरोधकांशी समझोता करावा लागणार आहे. त्यासाठी शरद पवार आणि नितीशकुमार यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण