शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश निवडीच्या नव्या पद्धतीस सुप्रीम कोर्टात आव्हान

By admin | Updated: August 22, 2014 01:49 IST

‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी मोदी सरकारने प्रस्तावित केलेली नवी पद्धत प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तिच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची गेली 20 वर्षे प्रचलित असलेली ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी यासाठी सहा सदस्यांचा एक राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग नेमण्याची मोदी सरकारने प्रस्तावित केलेली नवी पद्धत प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याआधीच तिच्या घटनात्मक वैधतेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयही त्यावर तातडीने सुनावणी घेणार आहे.
ही नवी पद्धत लागू करण्यासाठी मोदी सरकारने गेल्याच आठवडय़ात 121 वे घटनादुरुस्ती विधेयक व राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग विधेयक अशी दोन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली. संघराज्यातील किमान निम्म्या राज्यांनी या घटनादुरुस्तीस संमती दिल्यानंतर व राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतरच ही नवी पद्धत प्रत्यक्षात अमलात येणार आहे. यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्याआधीच या प्रस्तावित बदलाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल झाल्या आहेत. ज्या दिवशी ही विधेयके लोकसभेने मंजूर केली त्याच दिवशी सरन्यायाधीश न्या. आर. एम.लोढा यांनी ‘कॉलेजियम’ पद्धतीचे जोरदार समर्थन केले होते; पण ते त्यांनी उत्स्फूर्तपणो केलेले मौखिक भाष्य होते. आता येऊ घातलेल्या नव्या पद्धतीचा न्यायिक निकषांवर कस लावण्याचे काम सर्वोच्च न्यायालयास करायचे आहे.
माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विश्वजित भट्टाचार्य यांच्यासह आर. के. कपूर व मनोहर लाल शर्मा या तीन वकिलांनी व ‘सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड’ या वकील संघटनेने या याचिका केल्या आहेत. या याचिकांवर लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती अजर्दारांच्या वकिलांनी गुरुवारी केली तेव्हा याचिका येत्या सोमवारी सुनावणीसाठी येणार असल्याचे सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले.
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निवडीच्या नव्या पद्धतीसाठी संसदेने मंजूर केलेली दोन्ही विधेयके घटनाबाह्य असल्याचे नमूद करताना याचिकाकत्र्याचे असे म्हणणो आहे की, कार्यपालिका आणि न्यायपालिका परस्परांपासून पूर्णपणो स्वतंत्र असणो हे नि:पक्ष न्यायसंस्थेचे मूलभूत बलस्थान असून राज्यघटनेच्या अनुच्छेद 5क् मध्ये नेमके हेच अधोरेखित केले गेले आहे.
याचिकाकत्र्याचे असेही म्हणणो आहे की, न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य व निष्पक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा अविभाज्य भाग आहे व त्यास धक्का लागेल अशी घटनादुरुस्ती करण्याचा संसदेसही अधिकार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4199क् च्या दशकात लागोपाठ तीन निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ न्यायाधीशांच्या निवडप्रक्रियेत न्यायसंस्थेचे अर्निबध प्राबल्य प्रस्थापित केले. हे निकाल देताना न्यायालयाने एक प्रकारे घटनादुरुस्ती करून आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले, हे त्याही वेळी स्पष्ट झाले होते. परंतु न्यायसंस्थेला अंगावर न घेण्याच्या बोटचेप्या सरकारी धोरणामुळे न्यायसंस्थेचे हे अतिक्रमण दोन दशके निमूटपणो सहन केले गेले. गेल्या काही वर्षात हा विषय ख:या अर्थाने ऐरणीवर आला. 
 
4आधीच्या ‘संपुआ’ सरकारनेही ही विकृती सुधारण्यासाठी पुढाकार घेतला; पण त्यासाठी मांडलेली विधेयके संसदेत मंजूर होऊ शकली नव्हती. आता संसदेने ती मंजूर केली आहेत व त्यांची घटनात्मक वैधता तपासण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करणार आहे. एका परीने एका बाजूला संसद व कार्यपालिका व दुसरीकडे न्यायपालिका अशा संभाव्य घटनात्मक संघर्षाची ही नांदी ठरण्याची शक्यता आहे.