शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुटणारा भाजप दूर करा- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 08:26 IST

‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

पिंपरी (पुणे) : इंधनाच्या किमती दररोज वाढत असून, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरूपी संकटातून मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. ‘दिल्लीपासून गल्ली’पर्यंत केवळ लूट करण्याचे काम सुरू आहे. या लूट करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.रहाटणी काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, केंद्राचे सरकार हे महागाईचे सरकार आहे. कामगार हितविरोधी सरकार आहे. नोकरीची शाश्वती राहिली नाही. जीएसटीचे ३० हजार कोटी केंद्राकडे पडून आहेत. राज्य सरकारला कोणतीही मदत करण्याची भूमिका दिसत नाही. राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे.’‘केंद्राकडून सत्तेचा गैरवापर होतो हे सांगा’आता सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून ते काहीही गोष्टी करू शकतील. मात्र, हे फार काळ चालणार नाही. ते न चालण्याची परिस्थिती जनमानसात निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग कसा होतोय हे घराघरांत सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृत व्हायला हवे. भाजपरूपी संकटातून देशाची मुक्तता करायची आहे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी