शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचे केंद्रीकरण; राहुल गांधी यांनी केला पुन्हा जबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:04 IST

राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे. त्यांनी एका टष्ट्वीटमध्ये ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मधील (एचएसबीसी) भविष्यकालीन ‘अपयशी अंमलबजावणी’चे तीन विषय म्हणून कोविड-१९ विषाणू साथ, नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणी यांचा उल्लेख केला आहे.राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी. राहुल गांधी यांनी आपल्या टष्ट्वीटसोबत नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ जोडला आहे. या व्हिडिओत मोदी म्हणतात की, ‘महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. कोरोनाचे युद्ध आपण २१ दिवसांत जिंकू.’ मोदी भाषण करीत असतानाच व्हिडिओवर भारतातील कोरोना रुग्णांचा आलेख ‘सुपर इम्पोज’ होऊन वर चढत जाताना दिसतो. मोदीच्या भाषणाची क्लिप संपताना हा आलेख कोरोनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानी आल्याचे दर्शवितो. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणार असल्याचे सांगत असतानाच मोदी ‘थाळ्या वाजवून, टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, मेणबत्त्या-दिवे पेटवून अथवा मोबाईलचा लाईट लावून’ असे वक्तव्य करताना दिसतात.कोरोनाविरोधातील लढाईत टाळ्या-थाळ्या वाजविणे आणि दिवे पेटविण्याच्या मोदींच्या आवाहनावर याआधीच चोहोबाजूंनी मोठी टीका झालेली आहे.कोविड-१९ च्या हाताळणीबाबत मोदी सरकारवर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच टीका करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांची तुलना त्यांच्याकडून पाश्चात्त्य देशांशी करण्यात आली. कोरोना संकटाबाबत राहुल गांधी यांनी बुद्धिजीवी नागरिकांशी चर्चा केली आहे. कोविड-१ चे निमित्त साधून मोदी यांनी सत्तेचे केंद्रीकरण केल्याची टीका, राहुल गांधी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि गरीब लोक यांच्या झालेल्या हालावरूनही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.देशातील कोविड-१९ रुग्णांची संख्या गेल्या महिन्यात पाच लाखांच्या पुढे गेली तेव्हा राहुल गांधी म्हटले होते की, ‘मोदी सरकार कोविड-१९ साथीविरुद्ध लढायचे नाकारत आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ राहुल गांधी यांनी माध्यमांतील वृत्त पोस्ट केले होते.‘कोरोना विषाणू देशाच्या विविध भागांत पसरत असताना त्याविरुद्ध लढण्याची कोणतीही योजना सरकारकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत’, असे टष्ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार