शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचे केंद्रीकरण; राहुल गांधी यांनी केला पुन्हा जबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:04 IST

राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे. त्यांनी एका टष्ट्वीटमध्ये ‘हॉर्वर्ड बिझनेस स्कूल’मधील (एचएसबीसी) भविष्यकालीन ‘अपयशी अंमलबजावणी’चे तीन विषय म्हणून कोविड-१९ विषाणू साथ, नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणी यांचा उल्लेख केला आहे.राहुल गांधी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, ‘अपयशी अंमलबजावणी’च्या ‘केस स्टडीज’साठी ‘एचएसबीसी’मधील भविष्यकालीन विषय : १. कोविड-१९, २. नोटाबंदी, ३. जीएसटी अंमलबजावणी. राहुल गांधी यांनी आपल्या टष्ट्वीटसोबत नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ जोडला आहे. या व्हिडिओत मोदी म्हणतात की, ‘महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. कोरोनाचे युद्ध आपण २१ दिवसांत जिंकू.’ मोदी भाषण करीत असतानाच व्हिडिओवर भारतातील कोरोना रुग्णांचा आलेख ‘सुपर इम्पोज’ होऊन वर चढत जाताना दिसतो. मोदीच्या भाषणाची क्लिप संपताना हा आलेख कोरोनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानी आल्याचे दर्शवितो. कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणार असल्याचे सांगत असतानाच मोदी ‘थाळ्या वाजवून, टाळ्या वाजवून, घंटी वाजवून, मेणबत्त्या-दिवे पेटवून अथवा मोबाईलचा लाईट लावून’ असे वक्तव्य करताना दिसतात.कोरोनाविरोधातील लढाईत टाळ्या-थाळ्या वाजविणे आणि दिवे पेटविण्याच्या मोदींच्या आवाहनावर याआधीच चोहोबाजूंनी मोठी टीका झालेली आहे.कोविड-१९ च्या हाताळणीबाबत मोदी सरकारवर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच टीका करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांची तुलना त्यांच्याकडून पाश्चात्त्य देशांशी करण्यात आली. कोरोना संकटाबाबत राहुल गांधी यांनी बुद्धिजीवी नागरिकांशी चर्चा केली आहे. कोविड-१ चे निमित्त साधून मोदी यांनी सत्तेचे केंद्रीकरण केल्याची टीका, राहुल गांधी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि गरीब लोक यांच्या झालेल्या हालावरूनही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.देशातील कोविड-१९ रुग्णांची संख्या गेल्या महिन्यात पाच लाखांच्या पुढे गेली तेव्हा राहुल गांधी म्हटले होते की, ‘मोदी सरकार कोविड-१९ साथीविरुद्ध लढायचे नाकारत आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ राहुल गांधी यांनी माध्यमांतील वृत्त पोस्ट केले होते.‘कोरोना विषाणू देशाच्या विविध भागांत पसरत असताना त्याविरुद्ध लढण्याची कोणतीही योजना सरकारकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत’, असे टष्ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार