शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कांद्याच्या दरवाढी प्रकरणात केंद्रीय मंत्री पासवानांविरुद्ध फसवणुकीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 10:15 PM

ल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत.

मुझफ्फरपूर : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यास केंद्र सरकारलाही अपयश आलेलं आहे. वाढत्या कांद्याच्या दरामुळे सामान्य नागरिक पुरता त्रासलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिहारमधल्या मुझफ्फरपूरमधील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे एका व्यक्तीनं फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राजू नय्यर नामक व्यक्तीनं पासवान यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली असून, त्याआधारे कलम 420 (फसवणूक), 506 (धमकावणे), 379 (चोरी) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नय्यर यांनी तक्रारीत पासवान यांच्या दाव्याचा उल्लेख करत फसवणुकीचा आरोप लावला आहे. कांद्याच्या काळ्या बाजारामुळेच तुटवडा भासत असल्याचा दावा पासवान यांनी केला. हा दावा म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचं ते म्हणाले आहेत. कांद्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. तरीही सरकार त्यावर उपाययोजना न करता फसवणूक करत आहे, असा आरोप नय्यर यांनी तक्रारीत केला आहे.