शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

"कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 16:32 IST

केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, सध्या असलेल्या रुग्णालयांशिवाय, भविष्यात कोरोनाबाधितांसाठी मेक शिफ्ट रुग्णालयेदेखील तयार करावी लागतील.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले.केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ जण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ४७.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

नवी दिल्ली :केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. यात, 'देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर मेकशिफ्ट हॉस्पिटल्स तयार करावे लागतील,' अशी कबूल केंद्र सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, सध्या असलेल्या रुग्णालयांशिवाय, भविष्यात कोरोनाबाधितांसाठी मेक शिफ्ट रुग्णालयेदेखील तयार करावी लागतील. जेने करून कोरोनाबाधितांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले, की सध्या फ्रंटलाइन सर्व्हिस देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नरत आहे.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वात जास्त, तब्बल 9,304 रुग्ण समोर आले आहेत. तर 260 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 16 हजार 919 वर पोहोचला. तर आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 6 हजार 75 जणांचा मृत्यू झाला. अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेन आणि इटलीनंतर आता भारत जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांच्या यादीत जाऊन बसला आहे. 

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

देशात रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ जण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ४७.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय