शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्र सरकार लवकरच नवं सहकार धोरण आणणार; अमित शाह यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 08:49 IST

देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात केले स्पष्ट

ठळक मुद्देदेशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात अमित शाह यांनी केलं स्पष्ट

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच नवे सहकार धोरण आणणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले. 

देशातील पहिल्या ‘राष्ट्रीय सहकार संमेलना’स संबोधित करताना शाह यांनी सांगितले की, आगामी पाच वर्षांत देशातील प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांची संख्या वाढवून तीन लाख करण्यात येईल. सध्या देशात अशा ६५ हजार सोसायट्या आहेत. सहकारासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स, नॅशनल डाटा बेस आणि राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या संमेलनास सहकारी संस्थांच्या २,१०० प्रतिनिधींची उपस्थिती होती. देशभरातील सहा कोटी प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने संमेलनात भाग घेतला. सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असताना यंदाच्या जुलैमध्ये केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. 

‘संघर्ष होणार नाही’अमित शाह म्हणाले की, मी केंद्र आणि राज्याच्या झगड्यात पडू इच्छित नाही. याचे कायदेशीर उत्तर सावकाश दिले जाऊ शकते. केंद्र सरकार राज्यांना सहकार्य करील. कोणत्याही प्रकारे संघर्ष होणार नाही. सहकार क्षेत्राला अत्याधुनिक करण्यासाठी तसेच अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या पुढाकारातच नवे सहकार धोरण आणले जाईल.

टॅग्स :Amit Shahअमित शाहIndiaभारतdelhiदिल्लीGovernmentसरकार