शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

केंद्र सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प!; निवडणूक वर्ष असनाताही ‘लेखानुदान’ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:40 AM

पुढीलवर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत असतानाही केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरू केली आहे.

मुंबई : पुढीलवर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत असतानाही केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरू केली आहे.सार्वत्रिक निवडणूक ज्यावर्षी होते त्यावर्षी सहसा सरकारकडून ‘लेखानुदान’ मांडले जाते. त्यामध्ये फक्त पुढील सरकार स्थापन होईपर्यंत असलेल्या अपेक्षित खर्चाचा तपशिल मांडला जातो. पण मोदी सरकारने मात्र १ फेब्रुवारीला २०१९-२० साठी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी सर्व संबंधित विभागांना पत्र पाठविले आहे.केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी विभागांना १८ आॅक्टोबरला पत्र पाठविले आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी अपेक्षित असलेला खर्च व एकूण गरज, यासंबंधी विस्तृत मागण्या ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवल्या जाव्या, असे त्या पत्रात नमूद आहे. याखेरीज ‘लेखानुदान’ मांडायचे असल्यास केंद्र सरकार आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडत नाही. निवडणूक वर्षात आर्थिक सर्वेक्षण अहवाल निवडणुकीनंतर नवीन सरकारकडून मांडला जातो. पण ३१ जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण मांडण्यासाठी केंद्र सरकारने समितीची स्थापना केली आहे. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नियुक्तीसाठीही केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सल्लागारांची तीन वर्षांसाठी निवड करण्याचे केंद्राने निश्चित केले आहे. सरकारला केवळ ‘लेखानुदान’ मांडायचे असते तर त्यांनी आर्थिक सल्लागार निवडीची घाई केली नसती.लोकप्रिय घोषणांची शक्यताघडामोडींवरुनच केंद्र सरकार निवडणुकीला सामोरे जाण्याआधी पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची जय्यत तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक वर्ष असल्यानेच या पूर्ण अर्थसंकल्पात सरकार सर्वसामान्यांना आकर्षित करणाऱ्या लोकोपयोगी योजना मोठ्या प्रमाणात घोषित करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Parliamentसंसद