शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

मजुरांना रोजगार देण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन, आता शहरातही 'मनरेगा' योजना सुरू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 23:38 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे. 

ठळक मुद्देमनरेगाची मजुरी वाढवली असून, आता ती 202 रुपये रोज, अशी करण्यात आली आहे.सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत योजना सुरू करण्याचा विचारमनरेगा योजनेत मजुराला जास्तीतजास्त 100 दिवसांचा रोजगार देण्याची गॅरंटी दिली जाते. 

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संकट काळात देशभरात लागू करण्यात आलेल्या  लॉकडाउनमुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागांतील मजुरांनाही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मात्र ग्रामीण भागाचा विचार केला, तर तेथील मजुरांना केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेचा मोठा सहारा मिळाला आहे. यामुळे आता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारीचा सामना करत असलेल्या शहरी भागांतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार ही योजना शहरी भागांतही सुरू करण्याचा विचार करत आहे. 

सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत योजना सुरू करण्याचा विचार -देशातील शहरीभागातही मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग राहतो. या मजुरांच्या हाताला लॉकडाउनमुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ही योजना शहरी भागात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर मजुरांच्या हाताला काम मिळेल. माध्यमांतील वृत्तानुसार, सरकार सर्वप्रथम देशातील छोट्या शहरांत ही योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. कारण छोट्या शहरांतील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. या योजनेवर सरकार सुरुवातील 3,5000 कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहे. या प्लॅनवर सरकार गेल्या वर्षापासूनच काम करत आहे.

...तर देशाच्या अर्थवयवस्थेला गती मिळेल -शहरी भागात मनरेगा योजना सुरू झाल्यास देशाच्या अर्थवयवस्थेला गती मिळेल, असे मत जानकारांनी व्यक्त केले आहे. कारण ऑगस्ट महिन्याचा विचार करता, शहरी भागांतील बेरोजगारी दर 9.83 टक्के नोंदवला गेला आहे. तर ग्रामीण भागांतील बेरोजगारी दर 7.65 टक्के नोंदवला गेला आहे. हाच दर जुलै महिन्यात शहरी भागांत 9.15 टक्के तर ग्रामीण भागांत 6.6 टक्के एवढा नोंदवला गेला होता.

मनरेगाची मजुरी 202 रुपये करणयात आली आहे -केंद्र सरकारच्या वतीने 2020-21च्या अर्थसंकल्पात मनरेगा योजनेसाठी 61,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटाचा विचार करता, सरकारने या योजनेसाठी पुन्हा 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाने मनरेगाची मजुरी वाढवली असून, आता ती 202 रुपये रोज, अशी करण्यात आली आहे. मनरेगा योजनेत मजुराला जास्तीतजास्त 100 दिवसांचा रोजगार देण्याची गॅरंटी दिली जाते. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News : "अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर अमेरिकेच्या 4 लशी फेल होण्याची शक्यता"

कोरोना लस तयार व्हायला लागणार उशीर; माकडांच्या तुटवड्यानं संशोधन रखडलं!

शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या; पत्नी आणि मुलगीही जखमी

चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी