शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

केंद्र सरकारने केला आसामी जनतेचा घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 06:15 IST

चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

मेघना ढोके

देशाला आमचा प्रश्नच कळलेला नाही. माध्यमे नागरिकत्व कायद्याचा प्रश्न हिंदू-मुस्लीम असा मांडत आहेत, पण आसाम व ईशान्य भारतासाठी विदेशातून आलेले, येणारे लोंढे हा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. नागरिकत्व कायद्याला आम्ही करो या मरो या वृत्तीने विरोध करू, आसाम कदापि बांगलादेशी लोंढ्यांना स्वीकारणार नाही, असं स्पष्ट मत आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुलकुमार महंतो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलं.

१९८०च्या दशकात आसाममध्ये तरुणांनी परप्रांतीय लोंढ्यांच्या विरोधात सहा वर्षे चालविलेल्या आंदोलनाचे महंतो नेते होते. आसाम करार हे या आंदोलनाचेच फलित. त्यातूनच महंतो यांची आसाम गण परिषद सत्तेत आली. आसामचे मसिहा अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र, नंतर ते भाजपसोबत गेल्याने त्यांच्यावर टीका खूप झाली. नागरिकत्व कायदाप्रश्नी त्यांनी आसामच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांबाबत तुमच्या पक्षाची भूमिका काय?पूर्ण विरोध. शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करू. आसामींच्या जगण्यावरच आक्रमण होणार असेल, आसामात आम्ही अल्पसंख्य होणार असू तर जगायचं कसं, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. बंगाली लोंढे लादणारा हा घातक कायदाआहे.देशभर एनआरसी करू, अशा घोषण होत आहेत. त्यातच नागरिकत्व दुरुस्ती कायदा...तेच दुर्दैव आहे, आसामींनी एनआरसी शांतपणे निभावली, पण नव्या कायद्याने केंद्र सरकार ती मोडीत काढतेय. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू बंगाली लादून आसामलाच ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे...पण पुढे काय?भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, हेच आता मोदी सरकार बदलायला निघाले असेल, तर आम्ही आसामी आणि ईशान्य भारतीय तरी त्याचा प्राणपणाने विरोध करू. आम्हाला कोणत्याच धर्माचे ‘बिदेशी’ लोक नकोत, आम्ही हे लोंढे अनेकदा स्वीकारले आणि पस्तावलो आहोत. यापुढे आसामसह ईशान्य भारतात जो काही असंतोष उसळेल आणि त्याचे जे परिणाम होतील त्यांना केवळ केंद्र सरकार जबाबदार असेल. आसामी माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा कुणी पाहू नये! आमची भाषा, संस्कृती, रोजगार व अस्तित्व यावरच हा घाला आहे. एनआरसीचा खेळ झाला, जो विषण्ण करणारा आहे.बांगलादेशातील हिंदू बंगाली लादून आसामला ‘बंगालीबहुल’ करण्याचा हा डाव आहे. - प्रफुलकुमार महंतो 

टॅग्स :AssamआसामCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा