शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

केंद्र, राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा, देशात रुग्णांची संख्या २ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:58 IST

सर्वोच्च न्यायालय; देशात रुग्णांची संख्या २ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.सोमवारी कोरोनाचे ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळून आले, तर ३ लाख ७३२ रुग्ण बरे झाले. या दिवशी कोरोनामुळे ३४१७ जण मरण पावले आहेत. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९९२५६०४ झाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांचा आकडा ३४१३६४२ आहे. आतापर्यंत १६२९३००३ जण कोरोनातून बरे झाले, तर बळींची एकूण संख्या २१८९५९ आहे. देशात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.७७ टक्के झाले आहे.

कोरोनाची ही भयावह स्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने रविवारी एका आदेशात म्हटले आहे की, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी सार्वजनिक सभा, समारंभांवर, तसेच संसर्ग पसरू शकणाऱ्या अन्य कार्यक्रमांवर सध्या बंदी घालावी. केंद्र किंवा राज्य सरकारांनी जर लॉकडाऊन लागू केलाच तर त्याचा फटका तळागाळातील व गरीब लोकांना बसतो. त्यामुळे या लोकांचे हाल होणार नाहीत याची सरकारने आधीच तजवीज करून मगच लॉकडाऊनचे पाऊल उचलावे, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे.

कोरोना संसर्गाचा मोठा फैलाव होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजनांचा तपशील केंद्र व राज्य सरकारने सादर करावा, तसेच भविष्यात काय उपाययोजना करणार हेही सांगावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कोणताही कोरोना रुग्ण हा रुग्णालयात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता सरकारने घ्यावी, तसेच सर्व ठिकाणी औषधे, ऑक्सिजनची टंचाई अजिबात असू नये यासाठी प्रयत्न करावेत. निवासाचा पुरावा, तसेच ओळखपत्र नाही म्हणून कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही असे घडू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता नाहीn    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता नाही. केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.n    वाढता संसर्ग व रुग्णसंख्येमुळे १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी याआधीच कडक निर्बंध लागू केले आहेत. 

n    देशातील १५० जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण १५ टक्के असून तिथे कडक लॉकडाऊन लागू करावे अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने काही दिवसांपूर्वी केली होती.n    कुंभमेळ्याहून परतलेल्या लोकांमुळेही कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून त्यामुळे केंद्रीय आरोग्य खाते व कोरोना साथीसंदर्भात सरकारने नेमलेल्या टास्क फोर्समधील अधिकारीही चिंताग्रस्त झाले आहेत. n    देशात दररोज तीन लाखांपेक्षा नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. 

n    रेमडेसिविरसारखी औषधे तसेच ऑक्सिजनच्या टंचाईमुळे कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांनाही खूप हाल सोसावे लागत आहेत. ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन देशात होत आहे, असे केंद्र सरकार सांगत असले तरी त्याचा तुटवडा तर जाणवत आहे.n    केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोना साथीमधील स्थिती आणखी बिघडली आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

रुग्णालय प्रवेशाबाबत लवकरच धोरण हवेसर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत केंद्र सरकारने दोन आठवड्यांत धोरण ठरवावे. 

सहा महिने पुरेल इतका करा लससाठा देशात कोरोना लसींचा येत्या सहा महिन्यांच्या काळात पुरेल इतका साठा आहे का, याची केंद्र व राज्य सरकारांनी पडताळणी करावी, तसेच ऑक्सिजनचाही पुरेसा साठा करावा. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय