शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी!; अशोक चव्हाणांनी घेतली खासदारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 05:48 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय उचलावा यासाठी त्यांनी त्यांना विनंती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी यासाठी माजी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे अनेक खासदारांची भेट घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय उचलावा यासाठी त्यांनी त्यांना विनंती केली आहे.

चव्हाण म्हणाले, ‘राज्यांना केवळ एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार हा पर्याय नाही, तर सोबतच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करावी लागेल. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचीही हीच भूमिका आहे. एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार केंद्राकडे असो किंवा राज्याकडे, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिली तर मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला कायदेशीर कार्यवाही करून ही मर्यादा शिथिल करावी लागेल. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा ठराव मंजूर करण्यात आला होता.’

विषय संसदेत मांडावा

- हा विषय संसदेत मांडावा म्हणून अशोक चव्हाण यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आहे. 

- केंद्र सरकारने २०१८ मध्ये केलेल्या १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षण प्रकरणी दिला होता. 

- त्यामुळे राज्यांचे अधिकार पूर्ववत करण्यासाठी १०२ व्या घटना दुरुस्तीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसParliamentसंसदdelhiदिल्ली