शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

केंद्राने आश्वासने पूर्ण केलीच नाहीत; बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:51 IST

एमटीएनएलमध्येही आंदोलन; देशभरातील कर्मचारी सहभागी

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी सोमवारी देशभर लाक्षणिक उपोषण केले. दोन्ही कंपन्यांचे देशभरातील सर्व कर्मचारी त्यात सहभागी झाले होते.बीएसएनएलएमटीएनएल या तोट्यात व कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या कंपन्यांसाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१९ मध्ये ६८ हजार ७५१ कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. त्यात दोन्ही कंपन्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचाही भाग होता. त्यानुसार ७८ हजारांहून अधिक कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली; पण सरकारच्या बाजूने जे पॅकेज जाहीर केले, ते अद्याप दिलेले नाही, अशी दोन्ही कंपन्यांतील कर्मचाºयांची तक्रार आहे. बीएसएनएल व एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांना ४-जी स्पेक्ट्रम देण्याचे सरकारने ठरविले होते. ते अद्याप दिले नसून, या कंपन्या केवळ ३-जी स्पेक्ट्रम ही जुनीच सेवा ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक या कंपन्यांपासून दूर चालले आहेत. ते टिकवून ठेवण्यासाठी ४-जी स्पेक्ट्रम ताबडतोबीने देणे गरजेचे आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.या दोन्ही कंपन्यांना १५ हजार कोटी रुपये बाजारातून उभे करण्यासाठी बँक हमी देण्याचे केंद्राने मान्य केले होते. त्यामुळे या दोन्ही कंपन्या अद्यापही अडचणीत आहेत. केंद्राच्या बँक हमीशिवाय ही रक्कम उभी करणे दोन्ही कंपन्यांना अशक्य आहे. शिवाय आर्थिक पॅकेजही सरकारने दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांना आजही वेळेवर पगार मिळण्यात अडचणी येत आहेत.कंपन्या तगणार का?सरकारच्या आग्रहामुळे दोन्ही कंपन्यांतील ६८ हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असली तरी समस्या कायमच आहेत. त्यामुळे या कंपन्या जिवंत ठेवण्यात सरकारला रस आहे का, अशी शंका कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएल