शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

केंद्राने आश्वासने पूर्ण केलीच नाहीत; बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:51 IST

एमटीएनएलमध्येही आंदोलन; देशभरातील कर्मचारी सहभागी

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी सोमवारी देशभर लाक्षणिक उपोषण केले. दोन्ही कंपन्यांचे देशभरातील सर्व कर्मचारी त्यात सहभागी झाले होते.बीएसएनएलएमटीएनएल या तोट्यात व कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या कंपन्यांसाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१९ मध्ये ६८ हजार ७५१ कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. त्यात दोन्ही कंपन्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचाही भाग होता. त्यानुसार ७८ हजारांहून अधिक कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली; पण सरकारच्या बाजूने जे पॅकेज जाहीर केले, ते अद्याप दिलेले नाही, अशी दोन्ही कंपन्यांतील कर्मचाºयांची तक्रार आहे. बीएसएनएल व एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांना ४-जी स्पेक्ट्रम देण्याचे सरकारने ठरविले होते. ते अद्याप दिले नसून, या कंपन्या केवळ ३-जी स्पेक्ट्रम ही जुनीच सेवा ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक या कंपन्यांपासून दूर चालले आहेत. ते टिकवून ठेवण्यासाठी ४-जी स्पेक्ट्रम ताबडतोबीने देणे गरजेचे आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.या दोन्ही कंपन्यांना १५ हजार कोटी रुपये बाजारातून उभे करण्यासाठी बँक हमी देण्याचे केंद्राने मान्य केले होते. त्यामुळे या दोन्ही कंपन्या अद्यापही अडचणीत आहेत. केंद्राच्या बँक हमीशिवाय ही रक्कम उभी करणे दोन्ही कंपन्यांना अशक्य आहे. शिवाय आर्थिक पॅकेजही सरकारने दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांना आजही वेळेवर पगार मिळण्यात अडचणी येत आहेत.कंपन्या तगणार का?सरकारच्या आग्रहामुळे दोन्ही कंपन्यांतील ६८ हजार कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असली तरी समस्या कायमच आहेत. त्यामुळे या कंपन्या जिवंत ठेवण्यात सरकारला रस आहे का, अशी शंका कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएल