शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

दंडुका बाजूला ठेवून काश्मिरींशी चर्चा, संवाद साधण्यासाठी केंद्राचा प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:51 IST

नवी दिल्ली : फुटीरतावाद आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरमधील असंतोष दंडुकेशाहीने शमविण्याचा दृष्टीकोन बदलून केंद्र सरकारने आता तेथील जनतेशी संवाद साधण्याचे ठरविले.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : फुटीरतावाद आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरमधील असंतोष दंडुकेशाहीने शमविण्याचा दृष्टीकोन बदलून केंद्र सरकारने आता तेथील जनतेशी संवाद साधण्याचे ठरविले असून, त्यासाठी ‘संवादक’ (इंटरलोक्युटर) म्हणून आपला प्रतिनिधीही नेमला आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. काश्मीर समस्येवर तोडगा शोधण्यासाठी त्या राज्यातील सर्व समाजवर्गांशी निरंतर स्वरूपाचा संवाद करण्याचे सरकारने ठरविले आहे. यासाठी ‘इंटलिजन्स ब्युरो’चे (आयबी) निवृत्त संचालक दिनेश्वर शर्मा केंद्र सरकारच्या वतीने प्रतिनिधी म्हणून काम करतील, असेही त्यांनी जाहीर केले. या कामासाठी शर्मा यांना कॅबिनेट सचिवाचा दर्जा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.> शर्मा यांना सर्वाधिकारसंवादात काश्मीरमधील पाकधार्जिण्या फुटीरतावादी नेत्यांनाही सहभागी करून घेणार का? असे विचारता स्पष्ट नकार न देता गृहमंत्री म्हणाले की, याचा निर्णय शर्मा यांनी घ्यायचा आहे. त्यांना सर्वाधिकार दिले आहेत. संवाद सुरू असताना काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यावर केंद्राचा भर असेल आणि तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देईल, अशी ग्वाहीही राजनाथ सिंह यांनी दिली. काश्मीरबाबत केंद्र संवेदनशील आहे, हे सांगताना सिंग यांनी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा दाखला दिला. ‘गोळ्यांनी नव्हे, तर लोकांची मने जिंकूनच काश्मीर समस्येवर तोडगा निघू शकेल,’ असे मोदी तेव्हा म्हणाले होते.सरकारने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.ती यशस्वीपणे पार पाडेन, अशी अपेक्षा आहे.- दिनेश्वर शर्मा, काश्मीरचर्चेसाठी केंद्राचे प्रतिनिधीकाश्मीरमध्ये दंडुकेशाहीचामार्ग असफल ठरल्याची ही कबुली आहे. ‘अजिबात चर्चा’ नाहीते ‘सर्व संबंधितांशी संवाद’ हे स्थित्यंतर काश्मीर समस्येवरराजकीय तोडग्याचा सातत्याने आग्रह धरणाºयांचा विजय आहे.- पी. चिदम्बरम, माजी केंद्रीय गृहमंत्रीकाश्मीरची समस्या राजकीय स्वरूपाची आहे व ती त्याच पद्धतीने सोडविली जाऊ शकेल, हे मान्य करणे हा बळाचा वापर हाचमार्ग असल्याचे मानणाºयांचा मोठा पराभव आहे.- ओमर अब्दुल्ला,माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरRajnath Singhराजनाथ सिंह