शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिवाळखोरी कायद्यात केंद्राने केली सुधारणा; अध्यादेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 4:50 AM

एमएसएमईसाठी नवी प्रक्रिया

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) ‘पूर्व-निर्धारित समाधान प्रक्रिया’ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने दिवाळखाेरी कायद्यात सुधारणा केली आहे. नादारी व दिवाळखोरी संहितेत (आयबीसी) सुधारणा करण्यासाठी सरकारने एक अध्यादेश ४ एप्रिल रोजी जारी केला असल्याची माहिती एका अधिसूचनेद्वारे सरकारने दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सरकारने आयबीसी संहितेतील काही तरतुदी निलंबित केल्या होत्या. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.अध्यादेशानुसार, एमएसएमई  क्षेत्राचे व्यवसाय स्वरूप भिन्न प्रकारचे आहे. त्यांची संरचनाही साधीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे नियम आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.अध्यादेशात म्हटले आहे की, एमएसएमई क्षेत्रासाठी अधिक कार्यक्षम अशा  दिवाळखोरी समाधान प्रक्रियेची गरज आहे. ती अधिक गतिमान, स्वस्त आणि सर्व हितधारकांसाठी मूल्यवर्धित परिणाम साधणारी असणे आवश्यक आहे. याशिवाय व्यवसाय सुरूच राहण्याच्या बाबतीत ती किमान विध्वंसक असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत रोजगार जाणार नाहीत, याचीही खात्री असायला हवी. त्यानुषंगानेच नवे बदल करण्यात आले आहेत. ‘पूर्व-निर्धारित दिवाळखोरी समाधान’ प्रक्रिया एमएसएमई क्षेत्रासाठी आणण्यात आली आहे.समाधान योजना राबविल्या जाणार‘आयबीसी सुधारणा अध्यादेश २०२१’मध्ये मूलभूत आणि व्यवहार्य प्रकरणांत किमान व्यावसायिक अवरोध राहील हे पाहण्यासाठी पूर्व निर्धारित मार्गाने समाधान योजना राबविल्या जातील. यात कर्जदार-ताबा दृष्टिकोनाचे प्रतिमान वापरण्यात आले आहे. तथापि, कर्जदात्या संस्थांना महत्त्वपूर्ण सहमती अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे या यंत्रणेचा गैरवापर टाळता येऊ शकेल, असे मत जे. सागर असोसिएट्सचे भागीदार सौमित्र मुजुमदार यांनी व्यक्त केले. यामुळे एमएसएमईंना दिलासा मिळणार आहे.