शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळखोरी कायद्यात केंद्राने केली सुधारणा; अध्यादेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 04:50 IST

एमएसएमईसाठी नवी प्रक्रिया

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) ‘पूर्व-निर्धारित समाधान प्रक्रिया’ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने दिवाळखाेरी कायद्यात सुधारणा केली आहे. नादारी व दिवाळखोरी संहितेत (आयबीसी) सुधारणा करण्यासाठी सरकारने एक अध्यादेश ४ एप्रिल रोजी जारी केला असल्याची माहिती एका अधिसूचनेद्वारे सरकारने दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सरकारने आयबीसी संहितेतील काही तरतुदी निलंबित केल्या होत्या. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.अध्यादेशानुसार, एमएसएमई  क्षेत्राचे व्यवसाय स्वरूप भिन्न प्रकारचे आहे. त्यांची संरचनाही साधीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे नियम आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.अध्यादेशात म्हटले आहे की, एमएसएमई क्षेत्रासाठी अधिक कार्यक्षम अशा  दिवाळखोरी समाधान प्रक्रियेची गरज आहे. ती अधिक गतिमान, स्वस्त आणि सर्व हितधारकांसाठी मूल्यवर्धित परिणाम साधणारी असणे आवश्यक आहे. याशिवाय व्यवसाय सुरूच राहण्याच्या बाबतीत ती किमान विध्वंसक असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत रोजगार जाणार नाहीत, याचीही खात्री असायला हवी. त्यानुषंगानेच नवे बदल करण्यात आले आहेत. ‘पूर्व-निर्धारित दिवाळखोरी समाधान’ प्रक्रिया एमएसएमई क्षेत्रासाठी आणण्यात आली आहे.समाधान योजना राबविल्या जाणार‘आयबीसी सुधारणा अध्यादेश २०२१’मध्ये मूलभूत आणि व्यवहार्य प्रकरणांत किमान व्यावसायिक अवरोध राहील हे पाहण्यासाठी पूर्व निर्धारित मार्गाने समाधान योजना राबविल्या जातील. यात कर्जदार-ताबा दृष्टिकोनाचे प्रतिमान वापरण्यात आले आहे. तथापि, कर्जदात्या संस्थांना महत्त्वपूर्ण सहमती अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे या यंत्रणेचा गैरवापर टाळता येऊ शकेल, असे मत जे. सागर असोसिएट्सचे भागीदार सौमित्र मुजुमदार यांनी व्यक्त केले. यामुळे एमएसएमईंना दिलासा मिळणार आहे.