शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:49 IST

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे.

CEC Rajiv Kumar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जिल्हादंडाधिकारी/ रिटर्निंग ऑफिसर यांना फोन करुन धमकावल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान  काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. गृहमंत्री अमित शाह हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने जयराम रमेश याच्या आरोपांची दखल घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयागोना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीच्या आधी १५० जिल्हादंडाधिकाऱ्यांना फोन करुन धमकावले होते, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. जयराम रमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टद्वारे हे आरोप केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत जयराम रमेश यांच्याकडे त्यांच्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला होता. आयोगाने  जयराम रमेश यांच्याकडून रविवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सगळ्याबाबत भाष्य केलं आहे.

"हे कसे होऊ शकते?... कोणीही त्यांना (जिल्हादंडाधिकारी/रिटर्निंग ऑफिसर ) फोन करू शकेल का? हे कोणी केले ते सांगा, आम्ही त्याला शिक्षा देऊ... तुम्ही अफवा पसरवून सर्वांना संशयाच्या भोवऱ्यात आणता हे योग्य नाही," असं प्रत्युत्तर राजीव कुमार यांनी जयराम रमेश यांना दिलं आहे.

जयराम रमेश नेमकं काय म्हणाले?

"गृहमंत्री आज सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत १५० अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. ४ जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता संविधानाचे रक्षण करावे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह