शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:49 IST

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे.

CEC Rajiv Kumar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जिल्हादंडाधिकारी/ रिटर्निंग ऑफिसर यांना फोन करुन धमकावल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान  काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. गृहमंत्री अमित शाह हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने जयराम रमेश याच्या आरोपांची दखल घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयागोना याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीच्या आधी १५० जिल्हादंडाधिकाऱ्यांना फोन करुन धमकावले होते, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. जयराम रमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टद्वारे हे आरोप केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत जयराम रमेश यांच्याकडे त्यांच्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला होता. आयोगाने  जयराम रमेश यांच्याकडून रविवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सगळ्याबाबत भाष्य केलं आहे.

"हे कसे होऊ शकते?... कोणीही त्यांना (जिल्हादंडाधिकारी/रिटर्निंग ऑफिसर ) फोन करू शकेल का? हे कोणी केले ते सांगा, आम्ही त्याला शिक्षा देऊ... तुम्ही अफवा पसरवून सर्वांना संशयाच्या भोवऱ्यात आणता हे योग्य नाही," असं प्रत्युत्तर राजीव कुमार यांनी जयराम रमेश यांना दिलं आहे.

जयराम रमेश नेमकं काय म्हणाले?

"गृहमंत्री आज सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत १५० अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. ४ जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता संविधानाचे रक्षण करावे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह