शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

सीबीएसईचा फाॅर्म्युला ठरला, राज्य शिक्षण मंडळाचा कधी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 05:36 IST

विद्यार्थी, पालकांपुढे प्रश्नचिन्ह; दहावीचा निकाल वैयक्तिक प्रगतीनुसार घोषित करा, शिक्षकांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीबीएसई मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी पद्धत आणि निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली. मात्र, अद्याप राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनसंदर्भात काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा  फाॅर्म्युला कधी ठरणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळास्तरावर यंदाच्या दहावीच्या मूल्यमापनाची जबाबदारी सोपवावी, विद्यार्थ्यांच्या मागील काही वर्षांतील वैयक्तिक प्रगतीचा आलेख लक्षात घेऊन निकाल घोषित करावा, असे मत मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी मांडले.सीबीएसई मंडळाप्रमाणेच राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाच्या पद्धतीचा अवलंब होणार का, याकडे राज्यातील १६ लाख विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्य शिक्षण मंडळाला लवकरात लवकर स्वतःची अंतर्गत मूल्यमापन पद्धत व निकष जाहीर करावेच लागतील, तरच पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत मार्गी लागू शकेल, असे मत शिक्षकांनी मांडले.

सीबीएसई मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी, पालक सधन वर्गातील आहेत. मोबाइल, इंटरनेटची उपलब्धता असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणी, सहामाही परीक्षा झाली आहे. ऑनलाइन परीक्षा घेऊन व वेगवेगळ्या प्रकल्प देऊन मूल्यमापन झाले आहे. त्यामुळे त्यांचे निकाल तयार करणे या शाळेला सोपे जाणार असून, त्यांची पद्धती राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना तंतोतंत लागू होऊच शकत नसल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर कुठल्याही प्रकारच्या अधिकृत ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीत, तसेच शहरी भागात १ली ते १० पर्यंत ४० ते ५० टक्केच विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणात सहभागी झाल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती याहून वाईट असून, त्या विद्यार्थ्यांना गुण कसे देणार, यांसारखे अनेक प्रश्न शिक्षक स्वतःच उपस्थित करत आहेत. या सगळ्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेल्या मागील तीन वर्षाचा प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल पाहून, त्याचे सरासरी गुण काढले, तर या विद्यार्थ्यांचे काही अंशी याेग्य मूल्यमापन करता येईल, तसेच त्यामुळे खोटे गुण न देता, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, असे कुर्ल्याच्या शिशु विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी सांगितले.

मागील वर्षाशी तुलना करणे अशक्य!शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय सोपा असला, तरी अनेक विद्यार्थी, पालकांनी याला विराेध केला. हा पर्याय खरेच गुणवत्तेला योग्य न्याय देऊ शकेल का, विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा म्हणून यंदा केलेली मेहनत परिश्रम याची मागील वर्षाशी तुलना होऊ शकत नाही. अनेक शाळांमधून शिक्षक, शाळेकडून निवडक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाssc examदहावीResult Dayपरिणाम दिवस